मुंबईत आज आणि उद्या असे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे. मध्यरात्रीपासून मुंबई आणि ठाण्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरात आज 4 ऑगस्ट आणि 5 ऑगस्टला अतिवृष्टी (Mumbai Heavy Rain Alert) होण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने (IMD) वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतील नागरिकांनी सतर्क राहावं. असं आवाहन मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन विभागाने दिला आहे.
हे ही वाचा...
Video: खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना कोरोनाची लागण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्येला न जाण्याचा निर्णय
“राम मंदिरासाठी अशुभ मुहूर्त निवडल्याने भाजप नेत्यांना कोरोना”
स्वाभिमानी आणि निष्पाप लोकांसाठी मुंबई सुरक्षित नाही – अमृता फडणवीस
तसंच महापालिकेने समुद्र किनारे आणि किनाऱ्यालगत जाणे नागरिकांनी टाळावे. असं आवाहन केलं आहे. ठाण्यातही रात्रीपासून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईतील सखल भागात काही प्रमाणात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. मुंबईसह उपनगरांमध्ये गेल्या 3- दिवसात पाऊस थांबला होता. पण सोमवारी संध्याकाळपासून मुंबईत जोरदार पावसाला सुरूवात झालीये.
भारतीय हवामान खात्यानेही ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. दरम्यान मुंबईत खूप पाऊस असला तरी मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांच्या क्षेत्रात मात्र पुरेसा पाऊस झाला नसल्याने पाणीसाठा वाढलेला नाही.