#कोरोनाशी लढा : देशातील मृत्यूदर 2.11 टक्क्यांवर

Update: 2020-08-04 01:31 GMT

देशात कोरोनाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पण दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आता कमी होत असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. देशातील मृत्यूदर आता 2.11 टक्क्यांवर आला आहे. सोमवारी देशात 40 हजारांच्यावर रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. हा आतापर्यंतचा उच्चांक ठरलाय.

त्यामुळे आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या 11 लाख 86 हजार 203 एवढी झाली आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 65.77 वर पोहोचले आहे. त्यामुळे आता कोरोनावर उपचार सुरु असलेल्या रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 6 लाखांपेक्षा जास्त झाली आहे.

हे ही वाचा....

मुंबईत, ठाण्यात कोसळधार

Video: खासदार नवनीत राणा यांच्या कुटुंबातील 10 व्यक्तींना कोरोनाची लागण

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा अयोध्येला न जाण्याचा निर्णय

स्वाभिमानी आणि निष्पाप लोकांसाठी मुंबई सुरक्षित नाही – अमृता फडणवीस

तर सध्या 5 लाख 79 हजार 357 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान ऑक्सफर्ड विद्यापाठीने तयार केलेल्या COVISHIELD या कोरोनावरील लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला भारतात परवानगी देण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्युटतर्फे या चाचण्या केल्या जाणार आहेत.

Similar News