कांदा निर्यात बंदी: सरकारने शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार चालवली- बच्चूभाऊ कडू

Update: 2020-09-16 07:23 GMT

केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीवर शेतकऱ्यांच्या छातीवर तलवार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानं महाराष्ट्रात शेतकरी रस्त्यावर उतरला आहे.

या संदर्भात बोलताना राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालास भाव मिळू लागल्यास केंद्र सरकार शेतकरी विरोधी भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांची लूट कशी होईल. हे पाहत आहे. केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी लवकरच आपण दिल्लीत आंदोलन करणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे.

Full View

Similar News