उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडमध्ये; अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची तातडीने दखल

Update: 2026-03-20 06:50 GMT

बारामती, दौंड आणि परिसरात अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी गंभीर दखल घेतली आहे. नुकसानग्रस्त भागात तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश त्यांच्याकडून प्रशासनाला देण्यात आले आहेत.

शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळावी यासाठी प्रशासनाने वेगाने आणि प्रभावीपणे कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या आहेत.या पार्श्वभूमीवर संबंधित यंत्रणा कामाला लागली असून, नुकसानीचा आढावा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

Full View

शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या स्तरावर आवश्यक ती मदत लवकरच मिळणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

Tags:    

Similar News