शेअर्स आणि बाँड्समधील अस्थिरतेवर 'गोल्ड'चा उतारा | Gold Investment Strategy 2026 Marathi

Update: 2026-03-19 10:24 GMT

सध्याच्या अनिश्चित जागतिक परिस्थितीत सोने हे पोर्टफोलिओ विविधीकरणासाठी (Diversification) सर्वोत्तम साधन म्हणून समोर आले आहे. विशेषतः शेअर्स (Equities) आणि बाँड्समधील वाढती समानता पाहता, जोखीम कमी करण्यासाठी सोन्याचा आधार घेणे महत्त्वाचे ठरत असल्याचे 'वर्ल्ड गोल्ड कौन्सिल'च्या (WGC) ताज्या अहवालात म्हटले आहे.

बदलते समीकरण : शेअर्स आणि बाँड्स आता सोबत

ऐतिहासिकदृष्ट्या, जेव्हा शेअर बाजार घसरतो तेव्हा सरकारी बाँड्स गुंतवणूकदारांना संरक्षण देतात. मात्र, गेल्या काही वर्षांपासून हे समीकरण बदलले असून दोन्ही एकाच दिशेने प्रवास करत आहेत. अशा परिस्थितीत, सोन्याचा शेअर बाजाराशी असलेला 'नकारात्मक संबंध' (Negative Correlation) गुंतवणूकदारांसाठी सुरक्षा कवच ठरत आहे.

२०२६ मधील आव्हाने आणि सोन्याची झळाळी

२०२६ च्या सुरुवातीपासूनच जागतिक भू-राजकीय तणाव (Geopolitical Tensions) आणि वित्तीय बाजारातील अस्थिरता वाढली आहे. पश्चिम आशियातील (West Asia) संघर्ष भारतासाठी चिंतेचा विषय असून, याचा थेट परिणाम ऊर्जा पुरवठा, रुपयाचे मूल्य आणि महागाईवर होऊ शकतो. अशा कठीण काळात सोन्याने नेहमीच लवचिकता दाखवली आहे.

गुंतवणुकीत सोन्याचा वाटा किती असावा ?

WGC च्या १९ वर्षांच्या विश्लेषणातून काही महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले आहेत

आदर्श प्रमाण : पोर्टफोलिओमध्ये ७.५% ते १५% सोने असल्यास जोखीम कमी होऊन परतावा सुधारतो.

रुपयाची घसरण : आंतरराष्ट्रीय बाजारात सोने डॉलरमध्ये मोजले जाते. त्यामुळे रुपया कमकुवत होतो, तेव्हा भारतातील सोन्याचे दर वाढतात, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दुहेरी फायदा मिळतो.

दीर्घकालीन परतावा : सोन्याने केवळ संकटकाळातच नव्हे, तर दीर्घकाळात इक्विटी आणि इतर मालमत्तांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे.

वाढता भू-राजकीय तणाव आणि चलनाचा धोका लक्षात घेता, एक लवचिक पोर्टफोलिओ तयार करणे आवश्यक आहे. सोन्याचे विविधीकरण गुणधर्म आणि आर्थिक तणावाच्या काळात संरक्षण देण्याची क्षमता यामुळे ते गुंतवणुकीचा एक धोरणात्मक भाग ठरते. अशी माहिती, वर्ल्ड गोल्ड कौन्सिल. रिसर्च हेड कविता चाको यांनी दिली आहे.

सोनं हे केवळ दागिना नसून, बाजार कोसळत असताना तुमच्या संपत्तीचे रक्षण करणारे सर्वात प्रभावी साधन आहे. विशेषतः रुपयाच्या घसरणीमुळे मिळणारा अतिरिक्त परतावा भारतीय गुंतवणूकदारांसाठी जमेची बाजू ठरत आहे.

Tags:    

Similar News