सावधान! पाऊसाचा 20 जिल्ह्याना अलर्ट

Update: 2026-03-31 06:19 GMT

भारतीय हवामान विभागाणे दिलेल्या अंदाजानुसार काल राज्यातील अनेक भागात पासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि काही भागात गारपीटचा तडाखा बसला. राज्यातील 16 जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीट झाली. यात जालना जिल्ह्यात वीज पडून 2 जण तर नासिक आणि अहिल्यानगर येथ एक जण ठार झाले अवकाळी पाऊसामुळे राज्यातील 90 हजार हेक्टर वरील धान्य,भाज्या, आणि फळांच मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

हवामान विभागणे दिलेल्या अंदाजानुसार 3 एप्रिल पर्यंत 20 जिल्ह्याना अलर्ट राहण्याचा गारपीटचा ईशारा दीला आहे.

पश्चिमी विक्षोभाचे वारे महाराष्ट्रातही सक्रिय झाल्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, बीड, हिंगोली, परभणी, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, जळगाव, नंदुरबार, धुळे, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, साताऱ्यासह १६ जिल्ह्यांत वादळी पाऊस, गारपीट झाली. त्यात राज्यातील सुमारे ९० हजार हेक्टरवरील पिके, भाज्या, फळांचे नुकसान झाले असावे, असा प्राथमिक अंदाज आहे.

सायंकाळी आलेल्या अचानक नींबू अकराच्या गारपीट मुळे कापणीवर आलेल्या गहू हरभरा तसंच टरबूज खरबूज भाजी पाल्याच तसंच केळी आणि द्राक्षच मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी पुन्हा आर्थिक अडचणीत सापडणार आहे. दरम्यान आजपासून नुकसानीची पंचनामे केले जातील त्यानंतर अंतिम आकडेवारी समोर येईल. सलग चार दिवस 20 जिल्ह्याना अलर्ट दीला आहे यामुळे शेती नुकसानीची आकडेवारी वाढू शकते.

या 20 जिल्ह्याना पाऊसाचा अलर्ट :

राज्यात अवकाळी पाऊसाचा ईशारा हवामान विभागाणे 20 जिल्ह्यांत अलर्ट जारी केला आहे.

या जिल्ह्यांना यलो अलर्ट :

ठाणे, रायगड,

रत्नागिरी, सिंधुदूर्ग, धुळे, नंदुरबार, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नांदेड, लातूर, धाराशिव, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदीया, नागपूर, वर्धा, यवतमाळ.

ऑरेंज अलर्ट :

जळगाव, नाशिक, अहिल्यानगर,

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली.

Tags:    

Similar News