Weather Alert : सावधान! ३०-३१ मार्चला महाराष्ट्रात अवकाळी पाऊस आणि गारपीट; शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा

Update: 2026-03-28 04:57 GMT

Maharashtra weather update राज्यातील काही भागात पुन्हा अवकाळी पाऊसाचा फटाका बसणार आहे भारतीय हवामान विभागाणे ३०, ३१ मार्चला मेघगर्जनासह पाऊस तर काही ठिकाणी गारपीट चा अंदाज वर्तवला आहे. कृषी विभागाणे शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती या आठवड्यात कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागांमध्ये वादळी पाऊस पडू शकतो. हा पाऊस प्रामुख्याने कर्नाटक व तेलंगणा सीमेलगत असलेल्या मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व विदर्भातील सीमावर्ती भागांमध्ये राहण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामातील पिक काढणीच्या तोंडावर पावसाचे संकट उभे राहिले आहे.

३० व ३१ मार्च २०२६ दरम्यान राज्यातील काही भागांमध्ये प्रामुख्याने दुपारनंतर ढगाळ हवामान तयार होऊन मेघगर्जनेसह पाऊस आणि वादळी वाऱ्यांची स्थिती निर्माण होण्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाणे दिला आहे. खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील भागांमध्ये दिसून येऊ शकते. उर्वरित विदर्भात देखील हवामानात बदल दिसू शकतो. या दरम्यान विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवली आहे .

कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना आवाहन :

काही दिवसांपासून हवामानात सतत बदल होताना दिसत आहे. कधी पाऊस तर कधी उष्णता अशी स्थिती आहे. काही भागात कडाक्याची उष्णता आहे तर काही ठिकाणी पाऊस सुरू आहे. शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या अद्ययावत अंदाजांकडे लक्ष ठेवावे व त्यानुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने शेतकऱ्यांनी काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.

rain alert big warning, IMD issues alert, farmers on high alert, sudden rain threat, storm warning issued, weather shock India,UnseasonalRain, WeatherAlert, IMDAlert, MaharashtraRain, FarmerAlert, HailstormWarning, RabiCrop, ClimateChangeIndia, RainUpdate, StormAlert

Similar News