छत्रपती संभाजी महाराज:पराक्रमी,नीतिमान राजे
शिवरायांच्या मृत्यूनंतर न थकता सतत नऊ वर्षे मोगल, आदिलशाहा, सिद्दी, पोर्तुगीज आणि अंतर्गत शत्रूंविरुध्द संभाजीराजे लढत होते. संभाजीराजांनी मोगल फौजांना, साक्षात औरंगजेबाला सळो की पळो करून सोडले. औरंगजेब हतबल झाला. त्याने डोक्यावरील विमॉश खाली उतरवला आणि ‘संभाजीचे पारिपत्य केल्याशिवाय तो डोक्यावर धारण करणार नाही,’ अशी शपथ घेतली होती. अशा पराक्रमी, नीतिमान छत्रपती संभाजी महाराज यांच्या कार्याचा वेध घेणारा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांचा लेख मॅक्स महाराष्ट्रच्या वाचकांसाठी पुन्हा प्रसिध्द करीत आहोत.;
0