Brain Chemistry : डोपामाईन म्हणजे काय? आपला मेंदू कुणाच्या ताब्यात?

Update: 2026-02-07 09:44 GMT

कृती केल्यावर रिवार्ड म्हणून आपल्या शरीरात डोपामाईन Dopamine नावाचे न्यूरो ट्रान्समीटर बनते. डोपामाईन रिलीज झाल्यावर आपल्याला तात्पुरते बरे वाटते. प्राण्यांनी आपल्या सर्वायवल आणि रिप्रोडक्शन साठी कृती करावी म्हणून सगळ्या प्राण्यांमध्ये डोपामाईन बनते. डोपामाईन विषयी रिसर्च करत असताना शास्त्रज्ञांनी काही उंदरांच्या शरीरामध्ये डोपामाईन रिसेप्टर बंद करून टाकले. त्यांच्या शरीरात डोपामाईन बननारच नाही असे बदल केले. त्यानंतर ते उंदीर एका जागी पडून राहिले. भूक लागल्यावर अगदी कशावरही तुटून पडणारे उंदीर, अक्षरशः काही इंचावर ठेवलेले अन्न घेण्यासाठी सुद्धा पुढे सरकत नव्हते. त्यांची निष्क्रियता इतकी होती की ते अन्नाविना मरून गेले पण काही इंच पुढे सरकून अन्न सेवन करण्याची सुद्धा त्यांच्यात इच्छाशक्ती नव्हती. शरीरातला एक घटक कमी झाला तरी सुद्धा इतके भयानक परिणाम होऊ शकतात. आपल्या शरीराला होणाऱ्या मानसिक आणि शारीरिक व्याधी अशाच काही घटकांच्या टंचाईमुळे निर्माण होतात.

आपण मानव एक प्राणी आहोत.

सगळ्या प्रकारचे प्राणी एका अर्थाने बायो मेकॅनिकल डिवाइस असतात. आपल्या शरीरात असंख्य प्रकारच्या केमिकल रिएक्शन घडत असतात. या रिॲक्शन व्यवस्थित पद्धतीने होत राहिल्या आणि आपले शरीर ठीक ठाक राहिले तर आपण एक निरोगी आयुष्य जगू शकतो. पण बहुतेक लोकांच्या शरीरामध्ये कुठलीतरी व्याधी निर्माण होते. ही व्याधी निर्माण होण्यासाठी कुठलेही कारण असू शकते. जसे, अनुवंशिक, लाईफ स्टाईल मधल्या चुका, वातावरण, प्रदूषण, अन्न, पाणी, हवा इत्यादी.

आधुनिक काळात या व्याधी निर्माण होण्यासाठी नवे कारण निर्माण होत आहेत. आपल्या देशात प्रमाणाबाहेर वाढत चाललेले प्रदूषण सुद्धा लोकांच्या मानसिक आणि शारीरिक व्याधींमध्ये लक्षणीय भर घालत आहे. या व्याधींमध्ये शारीरिक व्याधींना आपला समाज एक्सेप्ट करतो. पण मानसिक व्याधींविषयी आपण बऱ्याच वेळा डिनायल मोड मध्ये असतो.

आपला मेंदू थोडा जरी शाबूत असेल तरी लक्षात येईल की आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर मानसिक विकृती निर्माण होत आहेत. बहुतांश लोकांना साईकीयाट्रिक ट्रीटमेंट ची गरज आहे. पण हे लोक या ट्रीटमेंट शिवाय समाजात वावरत आहेत. आणि आपल्या विकृतीने समाजात नवे प्रॉब्लेम निर्माण करत आहेत. हे अशा टोकाला जात आहे की नॉर्मल म्हणजे नक्की काय हेच आपण विसरत चाललो आहोत. या व्याधी "नवे नॉर्मल" निर्माण करत आहेत.

मानसिक व्याधी कुणालाही होऊ शकते, मग तो आयआयटी मधला विद्यार्थी का असेना. भारतीय लोकांना आयआयटी म्हणजे अकॅडमीक अचीवमेंटचे सर्वोच्च स्थान आहे असे वाटते. हा खूप वाईट स्टिरिओ टाईप आपल्यामध्ये पसरवलेला आहे. या आयआयटीत शिकलेला एक जण नंतर आपल्यावर ओढवलेल्या मानसिक व्याधीमुळे बाबा झाला, त्याला हवे ते उपचार मिळाले नाही आणि मग तो संन्यासी बनून जगतो आहे. हे मीडियाला सापडले आणि मीडियाने पुढच्या काही दिवसांसाठी भारतीयांसमोर एक नवे बाहुले उभे केले. आणि लोक सुद्धा या नव्या बाहुल्या मागे बेभान होऊन पळू लागले.

या बाबाला आता इतकी प्रसिद्धी मिळाली आहे की माझ्यामते त्याने संन्यास सोडून अध्यात्माच्या बिजनेस मध्ये उतरावे. खूप मोठे आर्थिक यश त्याची वाट बघत आहे. तो आता काहीही असंबंध बडबडत राहिला तरी लोक त्याच्या बडबडण्यामधून सुद्धा उदात्त फिलॉसॉफिकल अर्थ शोधत राहतील.

असाच एक सीओईपी मधून पास आऊट झालेला बाबा समोर मॅक बुक प्रो ठेवून प्रवचन देत असतो. आणि ते प्रवचन व्हायरल होत असतात. अध्यात्मिक प्रवचन या कंटेंट प्रकारातून याबाबाने स्वतःचे खूप मोठे ब्रॅण्डिंग करून ठेवले आहे. आणि करोडो रुपयांचा रिव्हेन्यू निर्माण केला आहे. आता, आपल्या देशाने एक नवा बाबा जन्माला घातला आहे. अभिनंदन!

Similar News