NCW Media Manthan : ज्या राज्यात महिला आयोग नाही, तिथे NCW महिलांच्या मदतीला धावणार – विजया रहाटकर
देशभरातील पत्रकारांना राष्ट्रीय महिला आयोगाने काय दिलं मार्गदर्शन? महिलांच्या प्रश्नांवर कसे करावे वार्तांकन? यासंदर्भात राष्ट्रीय पत्रकार संमेलनात नेमकं काय झालं जाणून घ्या.
Women Empowerment "एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रियांच्या प्रगतीवर अवलंबून असते… जर स्त्री प्रगत झाली की तो समाजही प्रगतीच्या दिशेने जाऊ लागतो." असं Dr. Babasaheb Ambedkar डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होत. त्याचप्रमाणे "जेव्हा स्त्री सशक्त होते तेव्हा समाज आणि राष्ट्रही सशक्त होतो." असं National Commission for Women राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर Vijaya Rahatkar, Chairperson यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली येथील सुषमा स्वराज भवन या ठिकाणी २० मार्च २०२६ ते २१ मार्च २०२६ रोजी NCW journalists conference 2026 'राष्ट्रीय पत्रकार संमेलन राष्ट्रीय महिला आयोगातर्फे आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय मीडिया मंथनमध्ये देशभरातील ७४ पत्रकारांची उपस्थिती होती. या संमेलनाचा मुख्य उद्देश पत्रकारिता करताना महिलांच्या प्रश्नांवर जबाबदार आणि जेंडर (लिंग)-संवेदनशील वार्तांकन करणे असा होता. (Responsible and Gender Sensitive Reporting on women issues)
'मीडिया मंथन' या राष्ट्रीय पत्रकार संमेलनाच्या उद्घाटन सत्रात दोन पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
१. ट्रूकॉलरचे ‘ट्रू साइबर सखी’ (Truecaller)
२. राष्ट्रीय महिला आयोगाचे ‘रिपोर्टिंग विद डिग्निटी’
राष्ट्रीय महिला आयोगाने NCW पत्रकारांसाठी Reporting With Dignity (सन्मानासह वार्तांकन) ही मार्गदर्शिका प्रकाशित केली. ज्याचा उद्देश महिलांवरील गुन्ह्यांचे वार्तांकन संवेदनशील, Ethical journalism नैतिक आणि पीडित-केंद्रित असावे, हे सुनिश्चित करणे असा आहे. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आलेली ही पुस्तिका, सन्मान आणि न्याय अबाधित राखण्यामध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका अधोरेखित करते. तर 'True Cyber Sakhi' हे डिजिटल सुरक्षा साधन संच (Toolkit) सादर केले आहे. ज्याचा उद्देश ऑनलाइन विश्वात महिलांना जागरूकता, कणखरता आणि संरक्षण देऊन सक्षम करणे हा आहे. हा उपक्रम, प्रत्येक महिलेसाठी अधिक सुरक्षित आणि सर्वसमावेशक अशा डिजिटल विश्वाच्या संकल्पनेला बळ देणारा आहे.
विजया रहाटकर काय म्हणाल्या?
'मीडिया मंथन' या राष्ट्रीय पत्रकार संमेलनात देशभरातील पत्रकारांचे स्वागत करताना विजया रहाटकर यांनी पत्रकारांनी नेहमीच समाजाला दिशा देण्याचं काम केले आहे. तळागळातील प्रश्नांना, अन्याय, अत्याचारांना वाचा फोडून वार्तांकन करत प्रत्येकाला न्याय मिळवून देण्याचं कार्य लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाने केले आहे आणि आजवर ते करत आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महिला आयोग महिलांप्रती आपले काम आणि महिलांना सन्मानपूर्वक न्याय, सुरक्षित वातावरण आणि महिलांविषयक कायद्यांबाबतची समाजात अधिकाअधिक जनजागृती करत आहेत. आयोगाच्या या महत्त्वपूर्ण कार्यात मीडियाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे राष्ट्रीय पत्रकार संमेलन आयोजित करून महिलांविषयी वार्तांकन करताना कोणत्या गोष्टींकडे सर्वाधिक लक्ष पत्रकारांनी दिलं पाहिजे यावर मार्गदर्शन केले.
रहाटकर म्हणाल्या, संबंधित प्रकरणाचे वार्तांकन करताना तुमचे शब्द कुणाचे तरी आयुष्य लिहिणार आहे. भविष्यात तुम्ही लिहिलेल्या शब्दांच्या नजरेतून समाज त्या महिलेकडे पाहणार आहे. त्यामुळे जबाबदार पत्रकारिता फक्त बातम्यांच्या सादरीकरणापुरती मर्यादित नसावी, तर जागरुकता वाढवणे, महिलांच्या सन्मानाचे, सुरक्षितेचे रक्षण करणे आणि लैंगिक समानतेला न्याय प्रोत्साहन देणारी असावी. आपण वार्तांकन करत असताना आपल्या बातमीत, हेडलाईनमध्ये भाषा जपून वापरावी. तसेच आपल्या भाषणात त्यांनी महिलांनी आजवर केलेल्या कामगिरीबाबत कौतुकास्पद माहिती दिली तसेच दुसरीकडे समाजात आजही अशा महिला आहेत ज्यांना दररोज कोणत्याना कोणत्या अडचणींचा सामना करावा लागतो. हिंसा, छळ, भेदभावासारख्या अनेक संकटांना त्या तोंड देत असतात… अशात जेव्हा पीडित महिला बातम्यांच्या केंद्रस्थानी येतात तेव्हा तिचा सन्मान, सुरक्षा, न्याय देणाची जबाबदारी महिला आयोगाची असतेच पण त्यापेक्षा वार्तांकन करताना तिच्या सन्मानाची, न्यायाची सर्वाधिक जबाबदारी पत्रकारांची असते.
"नैतिक पत्रकारिता वंचितांना वाचा फोडते आणि उत्तरदायित्वाची मागणी करते. विजया रहाटकर यांनी यावर भर दिला की, जबाबदार वार्तांकन हे जागृतीचे रूपांतर कृतीत आणि चिंतेचे रूपांतर अर्थपूर्ण बदलात करते. जेव्हा पत्रकारितेचे मार्गदर्शन नैतिकतेद्वारे केले जाते, तेव्हा ती न्यायासाठी एक प्रेरक शक्ती बनते.
वार्तांकण करताना पीडित महिलेच्या नावाचा दुरुपयोग किंवा तिला कमी लेखणारी हेडलाईन न देता योग्य न्याय मिळवून देणारे शब्द त्या वार्तांकनात वापरावे जेणे करून तिच्या चारित्र्यावर कुणी बोट करू शकणार नाही. तिचा सन्मान राखला जाईल. “जेंडर-संवेदनशील रिपोर्टिंग ही गरिमा, सत्य आणि न्याय यांच्याप्रती बांधिलकी आहे. यात महिलांच्या आवाजाला सन्मान दिला जातो, त्याला सनसनाटी बनवले जात नाही.” दरम्यान
या संमेलनात महिलांशी संबंधित विषयांवर जबाबदार आणि नैतिक पत्रकारिता कशी करावी यावर विशेष भर देण्यात आला. दोन दिवस चाललेल्या या कार्यक्रमात पत्रकारांनी अनुभवांची देवाणघेवाण केली तसेच बदलत्या मीडिया क्षेत्रात महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यावर चर्चा झाली. कार्यक्रमादरम्यान ‘रिपोर्टिंग विथ डिग्निटी’सारख्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शक प्रकाशनांचेही अनावरण करण्यात आले, ज्यातून पत्रकारांना नैतिक आणि संवेदनशील रिपोर्टिंगसाठी दिशा मिळणार आहे. तसेच मीडिया कायदे, नैतिकता, भाषा आणि सादरीकरण यांसारख्या विषयांवर डॉ. पिंकी आनंद, प्रज्ञा गौर (आयआयएमसी) कुलपती, स्वाती गुप्ता अशा विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यावेळी संमेलनात सहभागी पत्रकारांना समाजात सकारात्मक बदल घडविण्यासाठी आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रभावी भूमिका बजावण्याचे आवाहन करण्यात आले.
६ राज्यात महिला आयोग नाही तेथील महिलांनी काय करावे?
झारखंड, चंडीगढ, मध्य प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, राज्यस्थान या राज्यात राज्य महिला आयोग नसल्यामुळे तेथील महिलांनी मदतीसाठी राष्ट्रीय महिला आयोगाशी संपर्क साधावा. राष्ट्रीय महिला आयोग आपल्यासाठी कार्यरत आहे असं विजया रहाटकर आवाहन केलं आहे.
काय आहे राष्ट्रीय महिला आयोग ?
राष्ट्रीय महिला आयोग (NCW) ची स्थापना महिलांना सशक्त बनवण्यासाठी आणि त्यांच्या अधिकारांचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने करण्यात आली आहे. समाजात न्याय आणि भेदभावमुक्त वातावरण सुनिश्चित करण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन आहे. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 14 ते 16 यामध्ये याचा आधार आहे. राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 अंतर्गत 31 जानेवारी 1992 रोजी या आयोगाची स्थापना झाली. महिलांच्या आवाजाला प्रभावीपणे मांडण्यासाठी हा आयोग महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
महिलांसाठी राष्ट्रीय महिला आयोग नेमकं काय करतो?
* तक्रारी आणि चौकशी: राष्ट्रीय महिला आयोग महिलांविरुद्ध होणाऱ्या छळ, हिंसा आणि भेदभावाच्या तक्रारींची चौकशी करून त्यांचे निराकरण करतो.
* क्षमता विकास: महिलांना सशक्त करण्यासाठी विविध कार्यशाळा आणि कार्यक्रम आयोजित केले जातात.
* कायदेशीर मदत: महिलांना कायदेशीर सहाय्य आणि मार्गदर्शन दिले जाते.
* जेल आणि सुधारणा: महिलांसाठी सुधारात्मक उपायांची शिफारस केली जाते आणि संबंधित संस्थांचे निरीक्षण केले जाते.
* 24x7 महिला हेल्पलाइन: संकटात असलेल्या महिलांना 24 तास मदत पुरवली जाते.
* नवीन उपक्रम: महिलांचे अधिकार, सुरक्षा आणि कल्याण याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी नवीन कार्यक्रम सुरू केले जातात.
* प्रवासी भारतीय महिलांसाठी मदत: संबंधित अधिकाऱ्यांशी समन्वय साधून त्यांच्या तक्रारींचे निराकरण केले जाते आणि आवश्यक मदत दिली जाते.
* ईशान्य (उत्तर-पूर्व) क्षेत्रासाठी मदत: त्या भागातील महिलांना आवश्यक सहाय्य आणि जागरूकता दिली जाते.
* मीडिया सहभाग: माध्यमांच्या साहाय्याने महिलांच्या अधिकारांबद्दल जनजागृती केली जाते.
* स्वतःहून कारवाई (सुओ-मोटो): मीडिया अहवाल, सार्वजनिक सूचना किंवा संस्थात्मक अपयशांच्या आधारे महिलांच्या हक्कांशी संबंधित प्रकरणांमध्ये आयोग स्वतःहून हस्तक्षेप करतो.
एकंदरित २ दिवसांच्या या संमेलनात महिलांना सशक्त करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने वेगवेगळ्या उपक्रमाद्वारे उचलेल्या पावलांना देशभरातील माध्यमांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे महिलांनी आता घाबरायचे कारण नाही. महिला आयोग तुमच्या मदतीसाठी कायम असेल अशी ग्वाही राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी दिली आहे.
महिलांनो कुठलीही तक्रार करण्यासाठी २४ तास हेल्पलाईन नंबर १४४९० आपल्या सेवेत उपलब्ध आहे.
HelpLine Number - 14490
Email - complaintcell-nwc@nic.in
website - ncw.gov.in