पुणे-बंगळुरु महागार्गावर पाणी, वाहतूक ठप्प

Update: 2021-07-24 10:12 GMT

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले आहे. त्यामुळे सदरची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र नागरिकांची विनाकारण गर्दी होत असल्याने प्रशासनास मदतकार्य कऱण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना घरी राहून सहकार्य करावे असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच महामार्गावरील पाणी उतरताच वाहतूक सुरळीत केली केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक किरण भोसले यांनी दिली आहे.

Tags:    

Similar News