Senior citizens banking problems : बँका ग्राहकांसाठी आहेत की ग्राहक बँकांसाठी?
भारतातील खाजगी बँका का कोसळायला लागल्या? एचडीएफसी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राजीनामा का दिला ? वाचा लेखक डॉ. सुभाष देसाई यांचा लेख
Problems faced by senior citizens in banks आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत बँका या सुरक्षिततेचे प्रतीक मानल्या जातात. नागरिकांनी आपले कष्टाचे पैसे बँकेत ठेवावेत, त्यावर व्याज मिळावे आणि गरज पडल्यास सहज उपलब्ध व्हावेत हीच अपेक्षा असते. banks harass customers परंतु प्रत्यक्षात अनेक वेळा हीच बँकिंग व्यवस्था विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसाठी त्रासदायक ठरते, याचा प्रत्यय माझ्या स्वतःच्या अनुभवातून आला. जेव्हा आपण बँकेत नवीन खाते उघडायला जातो, तेव्हा असंख्य कागदपत्रे, ओळखपत्रे, पडताळण्या या सगळ्या प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. बँक मात्र आपले पैसे सहजपणे स्वीकारते. पण जेव्हा त्याच ग्राहकाला आपल्या पैशांची गरज भासते. उदा. कर्ज, मुदत ठेव परत मिळवणे किंवा खाते बंद करणे. तेव्हा बँक विविध अटी, अडथळे आणि विलंब निर्माण करते.
HDFC Bank मधील माझा अनुभव अत्यंत त्रासदायक ठरला. अनेक वर्षे खाते असूनही, एका डिजिटल समस्येमुळे खाते ब्लॉक झाले. ते उघडले गेले, पण त्यानंतरची सेवा पूर्वीसारखी राहिली नाही. सतत क्रेडिट कार्डसाठी फोन, ई-मेल्स येत राहिले, आणि ते बंद करण्यासाठी केलेल्या विनंत्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट, कार्ड घेतल्यास ठराविक रक्कम खर्च करण्याची सक्ती करण्यात येत होती. परिस्थिती अधिक गंभीर झाली जेव्हा मी खाते बंद करण्याचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे "वरची परवानगी" लागते, असे सांगून आठवड्यांचा विलंब करण्यात आला. RTGS द्वारे पैसे हस्तांतरित करण्यास नकार देण्यात आला, चेकबुक नसल्यामुळे नवीन चेकबुक मिळवण्यासाठी पुन्हा वेळ लावण्यात आला. दिलेला चेक परत येणे, "तांत्रिक कारणे" सांगणे या साऱ्या प्रक्रियेत ग्राहकाला मानसिक त्रास दिला गेला.
प्रश्न असा निर्माण होतो की, हा पैसा ग्राहकाचा असूनही तो मिळवण्यासाठी त्याला इतक्या फेऱ्या का माराव्या लागतात? बँका ग्राहकांसाठी आहेत की ग्राहक बँकांसाठी? अलीकडेच एचडीएफसी च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या राजीनामामुळे आणि शेअर मार्केट कोसळल्यामुळे यांच्याशी संबंधित बातम्या, आणि ग्राहकांचा ढासळलेला विश्वास या घटनांनी या प्रश्नाला अधिक धार दिली आहे. याच पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक धोरणांबद्दलही प्रश्न उपस्थित होतात. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्ट्या सुरक्षित राहतील का, हा प्रश्न अधिकच तीव्र होतो. जागतिक पातळीवरही युद्धाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होताना दिसतो.
ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे अनुभवसंपन्न घटक आहेत. त्यांच्या आर्थिक सुरक्षिततेची जबाबदारी ही बँकिंग व्यवस्थेची आणि शासनाची दोघांची आहे. बँकांनी ग्राहक सेवा सुलभ, पारदर्शक आणि संवेदनशील करणे अत्यावश्यक आहे. अन्यथा, "बँकिंग" ही सेवा नसून "छळ व्यवस्था" बनण्याचा धोका आहे.
BankingIssues, HDFCBank, SeniorCitizens, CustomerRights, BankingCrisis, IndiaEconomy, RBI, FinancialSecurity, BankComplaints, DigitalBanking