आणीबाणीला ५० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त सरकारच्यावतीनं २५ जून हा संविधान हत्या दिवस म्हणून पाळला जातोय. भारताच्या इतिहासातील काळाकुट्ट अध्याय म्हणूनही सरकारनं या दिवसाला संबोधलंय. लोकशाहीच्या रक्षणार्थ संकल्पबद्ध होण्याचंही आवाहन करणारं एक पोस्टरच सरकारनं स्वतःच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सर्व सोशल मीडिया हँडल्सवर टाकलंय. या पोस्टच्या खाली शेकडो नेटिझन्सनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. त्यापैकी ५० लक्षवेधी कमेंट्स खाली दिलेल्या आहेत.
१) Netaji Mane - गेली ११ वर्ष झाली देश रोजच अघोषित आणीबाणीतच जगतोय. ती आणीबाणी देश हितासाठी होती आताची सत्तेसाठी..
२) Sameer Patankar - आणीबाणीत इंदिरा गांधींनी नोकरशाहीतले झारीतले शुक्राचार्य सगळे उखडून फेकून दिले, बहुजन समाजाला व जास्त करून दलित समाजाला ह्याचा प्रचंड फायदा झाला. बहुमतामुळे जी कामे रखडली होती ती सगळी कामे करून घेतली , त्याचा फ़ायदा सर्वसामान्य लोक आजही घेत आहेत. आणीबाणी नसती तर आजही शुक्राचार्य वरचढ झाले असते, म्हणून त्यांना खुपते आणीबाणी.
३) Dilip Kakade - हेच खरे सर्वसामान्यांना आणीबाणीत मिळालेले फायदे आहेत बऱ्याच सावकार के करणाऱ्या धेंड्यांना लाचखोर अधिकाऱ्यांना बेभान झालेल्या प्रशासनाला तळ्यावर आणण्यासाठी व सर्वसामान्य जनतेचे जीवन सुखकर करण्यासाठी आणीबाणीने मोठे कार्य केलेले आहे हा काळा दिवस नसून सर्वसामान्यांसाठी आणि बाणी हीदिवाळी सारखीच होती , म्हणून जनतेने आणीबाणी दिवाळी साजरी करावी व भाजपा सत्तेत आलेला दिवस काळा दिवस साजरा करावा अशी विनंती आहे,
४) Shyam Bhosale - हे संकेतस्थळ शासनाचे आहे की भाजपा चे आहे, सार्वभौम राष्ट्राच्या राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाला तुम्ही शासनाच्या अधिकृत साईट वर चक्क काळा दिवस म्हणत आहात
५) Adv Umesh Khandare - लाज सोडलाय तुम्ही लोकांनी, दिवसा ढवळ्या महिला बलात्कार दिवस, क्लिनचीट दिवस, भ्रष्टाचार दिवस, बेरोजगार दिवस, आमदार पळवापळवी दिवस, पार लाज सोडून दिलेला दिवस पण साजरे करायला हवेत. #तुचीया सरकार
६) Manoj Unde - आज चित्र त्यापेक्षा ही भयानक असतांना प्रशासन निमूटपणे मालक जे सांगेल त्याची री ओढत आहेत. त्यावेळी लोकं रस्त्यावर उतरून विरोध करत होते आज त्यांना डांबलं जात आहे. आज जी हत्या होतांना दिसत नाही तर भुतकाळातील कटू सत्य दिमाखात दाखवून वर्तमानातील काळा कुट्ट घडामोडी लपवत आहेत.
७) Amol Padile - आजच्या दिवशी इंदिरा गांधींच्या काँग्रेस सरकारने देशाचं संविधान, लोकशाही चा बळी देत देशात राष्ट्रपती राजवट (हुकूमशाही)लागू केली होती. नागरिकांचे मूळ अधिकार रद्द केले गेले, विरोधी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकलं गेलं, वर्तमानपत्रात सरकार विरोधात लिहण्यास बंदी घालण्यात आली.... आणि हे कशामुळे ? तर इलाहाबाद हायकोर्टाने इंदिरा गांधींच्या विरोधात निर्णय दिला होता म्हणून...आज त्याच काँग्रेस चे नेते हातात संविधान घेऊन "संविधान बचाव" सारखी नाटकं करत आहेत !
#SamvidhanHatyaDiwas
#SamvidhanVirodhiCongress
८) Dipak Rade - Patil - दररोज संविधानाची हत्या होत असताना अशा प्रकारचे दिवस साजरे करणे हे ढोंगीपणाचे लक्षण आहे. अनधिकृत बेकायदेशीर मुख्यमंत्र्यांकडून दुसरं काय अपेक्षित?
९) Adv Rahul Jadhav - साहेब,50 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेवर राजकारण करण्यापेक्षा आताच्या परिस्थितीत ज्या महाराष्ट्र राज्याच्या समोर समस्या आहेत त्यावर उपाययोजना करा.बेरोजगार युवक, आत्महत्या करीत असलेले शेतकरी महागलले शिक्षण हे दिसत नाही का...? आपल्या जाहिरातीवर खर्च होणारा पैसा देखील जनतेचा आहे हे लक्षात ठेवा.
१०) Yogesh Shriniwas Khandelwal - आता हातात संविधान घेऊन त्यावर नसलेल प्रेम दाखवणाऱ्या काँग्रेसचा खरा चेहरा लोकांसमोर आणण्यासाठी हे करावंच लागेल.
११) Rajendra Muthane - अनुशासन पर्व - आचार्य विनोबा भावे .... अती स्वातंत्र्याचा गैरवापर करीत शासनातील नोकरशाही व बाहेरील अराजकीय ज्या भांडवलशाही पूरक बाह्यशक्तींनी स्वार्थासाठी भांडवलशाही विरोधातील लोकनियुक्त सरकार विरोधात सैन्याला उचकवत केलेल्या विद्रोही आवाहनानंतर नाईलाजाने त्याविरोधात उगारलेल्या शिस्तीच्या बडग्याचा सामान्य जनांच्या लोकशाही हक्काचे रक्षण करणारा दिवस ....
१२) Sandip Ghadge - उद्योगपतींच्या गुलामांनो आणि सत्तेसाठी भ्रष्टाचाऱ्यांना सोबत घेणाऱ्यांनो आणीबाणी जरी वाईट असली तरी तुमची लायकी नाही त्यावर टीका करायची.
१३) Sandesh Ranveer - लोकांना बोलण्याचा अधिकार राहिला नाही मीडिया समोर लोकप्रतिनिधी येत नाहीत त्यामुळे ही लोकशाहीची हत्या असून आणीबाणी पेक्षा भयाण स्थिती आहे.
१४) Vijay Dattatraya Mandake - *आजची परिस्थिती आणीबाणी पेक्षाही गंभीर* 1975 च्या भारतातील आणीबाणी जाहीर केलेल्या गोष्टीला आज 50 वर्षे झाल्याबद्दल देशात संविधान हत्या दिन काहीजण साजरा करत आहेत. मला त्याबद्दल एवढेच म्हणायचे आहे की इथे 2014 पासून रोजच संविधानाची हत्या होत आहे त्याचे काय बोला ? 1975 ची आणीबाणी घोषित होती. आत्ताची अघोषित आहे. आणि त्या आणिबाणी पेक्षाही देशांमध्ये भीषण अवस्था आहे. या विरोधात सर्व संविधान प्रेमींनी संविधान हत्या दिन पाळणारांच्या विरोधात रस्त्यावर उतरून आवाज उठवणे गरजेचे आहे. साहित्यिक, कीर्तनकार, प्रवचनकार, पत्रकार, कवी, विचारवंत, कलावंत यांनी खरे तर आपल्या साहित्यिकांनो जागे व्हा.
१५) Mayur Jitkar - त्या घोषित आणीबाणीचा निषेध पण भाषातज्ज्ञ, शिक्षणतज्ज्ञ यांचा विरोध डावलून लहान मुलांवर पहिलीपासून हिंदीची सक्ती केली जाते, शेतकऱ्यांचा विरोध डावलून शक्तीपीठ महामार्ग लादला जातो, या अघोषित आणीबाणीचे काय करायचे ?
१६) Sambhaji Bhilwande - हि संविधानाची हत्या नसून संविधानातील कलम ३५२(१) खाली आणीबाणी लागू करण्यात आली, १९७७ आणीबाणीनंतर सत्तेत आल्यानंतर, देशातील जनतेने सत्तारूढ जनतापक्ष व संघाला फक्त दोन वर्षांतच सत्तेतून बाहेर का काढले आणि पून्हा काँग्रेसला तब्बल चाळीस वर्षे दिर्घकालीन सत्ता दिली हे विसरून चालणार नाही.
१७) अभिजीत गंभीर - बाकी काळे दिवस होते पण नवीन लोकशाहीतील हे उत्सव आहेत
• नोटबंदी
• स्वयंघोषित लॉकडाऊन
• वाशिंग मशीन पक्ष (परक्या पक्षात असताना देशद्रोही, भ्रष्टाचारी, फक्त ह्यांच्या पक्षात राष्ट्रप्रेमी)
• फक्त महाराष्ट्रासाठी त्रिभाषा उत्सव (परप्रांतीय या आणि बोकांडी बसा)
१८) Shankar Gawali - हो आणीबाणी चुकीचीच होती, पण शासकीय संकेतस्थळावरून राजकीय प्रचार करणं हा नीच उद्योग आहे...
१९) Aspatwad BM Sanjay - स्वतः घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी कितपत यशस्वी झाली याचा विचार आणि चर्चा केली असती तर चांगले वाटले असते. 11 वर्षे झाली तरी तीच कॅसेट ऐकवली जाते आहे. ते लोकांना नालायक वाटले म्हणून तर सरकार बदलले. तुमचं कर्तृत्व सिद्ध करा. तुम्ही केलेली पातळ संडास सगळीकडे पसरली आहे आणि तिला घाण वासही येत आहे. जुन्या वाळलेल्या लेंडीकडे बोट दाखवून तुमची घाण लपणार नाही. फारच केविलवाणा प्रयत्न केला आहे, लोक थुंकत आहेत तुमच्या कृती वर. नोट बंदी घालण्यात आली तोच खरा काळा दिवस म्हणून पाळण्यात यावा.
२०) Santosh Kodalepatil - यातुन प्रशासन किती लाचार झालंय संघ विचारानं हेच दिसतंय...आजची मनमानी, फोडाफोडी, कुरघोडी, हिंदी सक्ती व अशी अनेक गलिच्छ कामं ही आणिबाणी पेक्षा कमी नाहीत....
२१) Diksha Pawar - ती आणीबाणी सांगून होती,पण 2014 पासून गोरगरिबांच्या मुंडक्यावर पाय देऊन,तरुणांचे रोजगार हिरावून,भारताला भिकारी बनवणारा हे सगळे चोर न सांगता अशी लूटमार करताय त्याच काय? लाजा वाटू द्या हरामखोरांओ
२२) Subhash Kamaji Kadam - हा पेज चालवणारा किंवा त्याचा बाप आणिबाणीत संजय गांधींच्या हाती सापडला पाहिजे होता,साल्याची नसबंदी झाली असती तर हा दिवस पाहण्याची वेळ आली नसती.
२३) Sachin Khot - संघाने पाठिंबा दिला होता. भामट्यांनो. किती लाज सोडुन वागणार आहे.
२४) Sooraj Samant - ते सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांचे आणीबाणी ला समर्थन असणारे पत्र आणि माफीनामे सुद्धा प्रसिद्ध कराल का ? सगळंच समजू दे जनतेला.
२५) Sandeep N - हे महाराष्ट्र शासनाचे पेज आहे की संघाचे? आणि संघाने देखील तेंव्हा आणीबाणी ला पाठिंबा दिला होता. देशाच्या संविधानानुसार लागू झालेल्या गोष्टीला तुम्ही संविधान हत्या दिवस म्हणताय? अरे काम अशी करा की किमान लोकांच्या नजरेत येणार नाहीत. आणि सेंगोल कुठे घुसवताय , भारताचे प्रतीक अशोक स्तंभ आहे.
२६) B G KolsePatil - आजच्या अघोषित आणीबाणीच्या जाचापेक्षा ती घोषित आणिबाणी हजार पट चांगली होती रे खोटारड्यांनो !
२७) Vijay Pawar - आणीबानी तरी बरी,तुम्ही तर हुकूम शाही सारखे जनतेशी वागत आहात. आणि हॊ तुमच्याकडे कोणत्या ही प्रकारचे विकासात्मक धोरण नसल्याने तुम्ही फक्त अशाच प्रकारचे इव्हेन्ट साजरे करून पूर्ण 11वर्षे पूर्ण केलीत. असे इव्हेन्ट साजरे करून जनतेला काय मिळणार. विकासाचे नांव घ्यायचे आणि फक्त हे अश्या प्रकारचे इव्हेन्ट साजरे करायचे या पलीकडे तुम्ही काहीच केले नाही.
२८) Vijay Varkhade - ते जाऊदे २०१९ ला महाराष्ट्रात लागलेली आणीबाणी लोकशाहीचा नवा जन्म होती का ?
२९) Rajesh Ghadge - आणीबाणी मध्ये बँकांचे राष्ट्रीयकारण झाले आणि बहुजन समाज आणि दिन दुबळ्यांना त्याचा आज पर्यंत फायदा होतोय. गरिबांना त्या काळात सरकारी बँका दरवाजात सुध्दा उभ्या करीत नव्हत्या त्या राष्ट्रीय करण झाल्यावर अनेक जणांना गृहकर्ज, व्यवसाय कर्ज, शैक्षणिक कर्ज उपलब्ध झाले त्यामुळं आणीबाणी चा सर्वसामान्य लोकांना फायदाच झाला.
३०) Ravindra Tiwari - ....... आणीबाणी ज्या स्थितीत ज्या परिस्थितीत ज्या काळात लागू करण्यात आली त्याबद्दल अभिनंदन...... त्याच आणीबाणी च्या नावाने ज्यांना पेन्शन मिळत आहे व त्याच आणीबाणीच्या नावाने संबंधितांच्या पोटात दोन घास जात आहे याबद्दल पुन्हा एकदा आणीबाणीचे अभिनंदन.......
३१) Rajendra Patil - कायदेशीरपणे लावलेल्या आणीबाणीच्या संघोट्यांना शुभेच्छा !! अघोषीत हुकुमशाही लादून जनतेचा छळ करणाऱ्या संघी भाजपाई सरकारचा निषेध.
३२) Sudhir Salaskar - जुने मुडदे उकरून लोकांना भरकटवण्याचा प्रयत्न सुरू आहे.लोकांनी त्यांचे रोजचे जीवनमरणाचे प्रश्न विसरून जावेत आणि नको त्या विषयावर व्यक्त व्हावे हा या मागचा उद्देश. सगळे भ्रष्टयाचारी एका छताखाली का आले? स्विस बँकेत तिप्पट पैसा कुणाचा जमा झाला? बुलेट ट्रेन कोणा साठी? मुख्य जुने हायवे, शहरातील रस्ते खड्ड्यात आणि नवीन गुळगुळीत हायवे कशासाठी? शेतकरी कर्जात आणि उद्योगपती कर्जमुक्त कारण काय? मराठी शाळांमध्ये हिंदी भाषेची सक्ती का ? शिकलेल्या हाताना चांगला रोजगार कधी मिळणार? अत्याचार आणि हुंडाबळी कधी थांबणार? अच्छे दिन नक्की कोणाचे आलेत? शेअर मार्केट वर चाललं आहे आणि गरीब चिंतेत आहे कारण? असे अनेक प्रश्न आज कुणाला पडूच नयेत म्हणून हे सर्व चाललं आहे का?
३३) Chintaman Patil - आज सत्तेचा माज हीच आणिबाणी होय.आत्मपरिक्षण करा मग काळ दिवस पाळा.आज रोजच काळा दिवस उगवतो त्याच काय ?
३४) Tanaji Khapre Patil - संघ हत्या दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
३५) श्री प्रशांत प्रमोद परांजपे - काँग्रेस परंपरेत वाढलेले अजितदादा पवार आणि ज्या बाळासाहेब ठाकरेंनी आणीबाणीचे समर्थन केले त्यांचा वारसा सांगणारे एकनाथ शिंदे यांचे फोटो वापरून संविधान हत्या दिवसाची जाहिरात केली, यावरून भाजपवाले या दोन उपमुख्यमंत्र्यांना किती मोजतात दिसून येते. अशोक चव्हाणांनी अजून आणीबाणीचा निषेध केला नाही, अध्यक्ष महोदय!
३६) Ulhas Chaudhari - संघाच्या बाळासाहेब देवरस यांनी आणिबाणीच्या काळात तीन माफीपत्रे इंदिरा गांधी यांना पाठविली होती. बाळासाहेब ठाकरे यांनी आणिबाणीला पाठिंबा दिला होता.
अटल बिहारी वाजपेयी फक्त काही दिवसच कैदेत राहिले, बाकी वेळ ते पॅरोलवर बाहेरच होते...हो, गुन्हेगार रामरहीम पॅरोलवर बाहेर राहतो, तोच प्रकार! याच आणिबाणीच्या विरोधात जयप्रकाश नारायण हे फॅशिस्ट नेते संघाने पुढे आणले....जसे अण्णा हजारे पुढे आणले गेले आणि नंतर टाकावु झाले. याच जयप्रकाश नारायण यांनी देशातील सैन्य आणि पोलिसांना सरकारचे आदेश पाळू नका, असा फतवा काढला होता. शेवटी, कायद्याने आलेली आणिबाणी इंदिरा गांधींनी लोकशाहीचे प्रमुख अंग असलेल्या निवडणुका जाहीर करत मागे घेतली, ज्यामध्ये त्यांचा पराभव झाला. नंतर देशद्रोही संघ आणि जनसंघाचा भाजप झालेला पक्ष सत्तेत आला आणि त्याचे पर्यवसान पुढे प्रचंड धार्मिक राजकारणात होऊन अडवाणी सारख्या द्वेषाचे राजकारण करणाऱ्या नेत्यांच्या मोठेपणात झाले. आपण आज ह्या सर्व गोष्टींची फळे "चाखत" आहोत.
३७) Shirish Tiwari - दम असेल तर निवडणूक बॅलेट वर घ्या मग इमर्जंसी वर बोला ...इंदिरा ने लगेच निवडणुक घेतली होती ..हिंम्मती असाल तर निवडणुक आयोगा वरील आणि बाणि हटवा
३८) Sanjay Laxmanrao Lokhande - यांच्या कड़े मुद्दे नाहित म्हणून काही उलट सुलट कामे सुचतात, जुमलेबाज व सर्वात खोटे, काही महिन्यांनी देशाचा जुमला दिवस मनवायला हरकत नसावी
३९) Damodar Lele - घोषित आणीबाणी करायला खरी 56" छाती लागते. काही वर्षांनी ती एक चूक होती/ठरली हे कबूल करायला तर किती मोठे मन लागत असेल? हे ह्या लोकांच्या व पक्षाच्या गावीही नसेल. संविधाना संबधीची छुप्या, कपटनीतीने, गुप्त रीतीने तोडफोड होण्यापेक्षा उघड उघड एखादा निर्णय घेतला तर परवडेल लोकशाही जपायला.
४०) Uday Chaughule - काँग्रेस ने आणिबाणी लावुन लोकशाही ची हत्या केली आता काँग्रेसी गुलाम सरकार वर किती ही आगपाखड करोत पण जळली चांगली च कॉँग्रेस चमच्यांची
४१) Adv Amoll Gavhane - तुमच्या सत्तेत तुम्ही कमावलेले….
पन्नास खोके दिवस
पक्ष फोडा-फोडी दिवस
सत्तेसाठी आमदार अपहरण दिवस
महिला बलात्कार भाजप कार्यकर्ता प्रशिक्षण दिवस
लोकशाही चा बलात्कार दिवस कधी साजरे करताय ?
चोर,गुंड,मवाली यांना पक्षप्रवेश देऊन पावन करून घेणं दिवस ?
कधी साजरे करताय?
#नालायक_भाजप_सरकार
#नालायक _भाजप _सरकार
४२) Kunal M. Dawane - तुम्ही फक्त कमेंट वाचा अन् लोकभावना काय आहे ते समजून घ्या...जनता वेडी राहिली नाही...
४३) Girish Mane - पन्नास वर्षापुर्वी काँग्रेसने अतिशय मोठी चूक केली, त्या नंतर त्यांनी बऱ्याच चूका केल्या हे जनतेला चांगलच माहिती आहे व म्हणूनच गेले तीन निवडणूका ते हरले व सत्तेबाहेर आहेत. आता तुम्हाला सत्ता जनतेने देशासाठी व जनतेचे भलं करण्यासाठी दिली आहे त्या मुळे भुतकाळाचा उकिरडा उचकण्या पेक्षा भविष्यावर भर द्या भविष्यात काय करणार आहात ते सांगा.
४४) Sachin Ashok Nikam - भाजप वाल्यानी संविधानाचा अवमान चालवला आहे नालायक लोक सरकारच्या पैशात काँग्रेसचा विरोध म्हणून कार्यक्रम चालवत आहेत.
४५) Ashish Devtale - डोकं ठिकाणावर आहे का सरकारचं? महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत पेजवरून इंदिरा गांधी यांच्या काळातील आणीबाणीला ‘संविधान हत्या दिवस’ म्हणणं म्हणजे इतिहासाचा अपमान नाही, तर सरकारी माध्यमांचा राजकीय बदला घेण्यासाठी गैरवापर आहे. राज्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत, महिला असुरक्षित आहेत, बेरोजगारी वाढतेय, पावसाचा तोंडवळा नाही — आणि हे सरकार इतिहासाचे राजकारण करण्यात मश्गूल आहे. ही पोस्ट सांगते की सरकार जनतेच्या दुःखाशी नाही, तर फक्त विरोधकांशी झगडण्यात व्यस्त आहे. आधी राज्य चालवा, मग इतिहासावर भाष्य करा. Maharashtra DGIPR
४६) Pramod Kusum Eknath Bonde - उठा उठा 25 जूनची पहाट झाली! आजची स्वतःची आणीबाणी लपवून पन्नास वर्षापूर्वीच्या इतिहासावर गळे काढण्याची वेळ आली! आजचे संघ-भाजपवाले 1975 च्या आणीबाणीबद्दल कढ काढतात तेव्हा ते शोलेमधल्या गब्बरसिंगानं 'पन्नास वर्षापूर्वी रामगढच्या लोकांच्या घरी चोरी करणाऱ्या लोकांचा मी निषेध करतो' असं म्हणल्यासारखं वाटतं. आजची किंवा कालची किंवा उद्याची, कोणत्याही आणीबाणीवर टीका करण्याचा अधिकार फक्त त्याला असतो जो आयुष्यभर इतरांचं अभिव्यक्तीस्वातंत्र्य मान्य करत आलेला आहे. आपल्याविरूद्ध बोलणार्या पत्रकारांच्या नोकऱ्या घालवणाऱ्यांनी आणीबाणीवर बोललेलं ऐकतांना मजाच वाटते. पुण्यासारख्या सुसंस्कृत ठिकाणी दिवसाढवळ्या पोलीसांच्या गूढ मौनात पत्रकाराच्या गाडीवर काठ्यालाठ्यांनी हल्ले करणाऱ्या गुंडांनी तरी आणीबाणीवर बोलतांना लाज बाळगावी. निवडणुक आयोग, ईडी, सीबीआय ताब्यात घेऊन आणीबाणीच्या वेळी इंदिरा गांधींनी यंत्रणा ताब्यात घेतल्या असं म्हणायला छप्पन इंची छाती लागते. आजचा मोदींचा संघपरिवार आणि मोदींचा भाजप जेव्हा कालच्या आणीबाणीवर बोलतो तेव्हा त्यातून विनोदनिर्मिती शिवाय इतर काहीही घडत नाही. काय अधिकार आहे तुम्हाला? कोणत्या अधिकारात तुम्ही तेव्हाच्या आणीबाणीचा विरोध करता? कशाला स्वतःला जास्तच उघडं पाडता?
४७) Prathamesh Kasabe - किती चुकीचा पायंडा पाडता हो तुम्ही. संविधान हत्या दिवस म्हणून तुम्ही संविधानाचा अपमान करत आहात. संविधान संपलेलं नाही. संविधान लागू आहे.आणि मी एक भारतीय नागरिक संविधानाचा सन्मान आयुष्यभर करत राहीन. तुम्ही राजकारणासाठी चुकीचं शब्दप्रयोग करू नका. आणीबाणी लागू करणे ही सुद्धा संविधानाची तरतूद आहे त्यासाठी कलम 352,356,360 वाचा.
४८) Nandkishor Talashilkar - संविधानाने दिलेल्या हक्का नुसार आणीबाणी लादली गेली. ती चूक की बरोबर यावर चर्चा होऊ शकते. पण संविधान हत्या दिवस संविधान पाळण्याची जबाबदारी असलेल्या सरकारने असे चुकीचे जाहिरात करणे हा संविधानाचा अवमान आहे. सरकारने ही जाहिरात मागे घ्यावी... सरकार जरी जाहिरात करत असेल तरी आमच्या करदात्यांच्या पैशातूनच जाहिरात आहे .त्यामुळे असे चुकीच्या जाहिराती करू नये.
४९) Ambadas Wankhade - सगळेच गुन्हेगार जेलमधे जाणार होते. पन ते सगळेच भाजप मधे गेलेत आता याला काय समजायच. एकदा हे पन शासनाच्या पेजवर सांगुन स्पष्ट करा महोदय
५०) Sumit Bhagat - Maharashtra DGIPR - सर्व कमेंट वाचा आणि तुमच्या मालकांना सांगा की तीर उलटा फिरलाय!