राज्यात पुन्हा निवडणूका होतील – जयकुमार रावल

Update: 2019-11-04 03:23 GMT

निवडणूकांचा निकाल जाहीर झाल्यानंतर देखील सत्ता स्थापनेचं चित्र अजुन स्पष्ट झालेल नाही, त्यामुळे अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा निवडणूका होण्याची शक्यता आहे असं मत भाजपचे मंत्री जयकुमार रावल(jaykumar rawal) यांनी व्यक्त केलं आहे.

जयकुमार रावल यांनी धुळे(dhule) येथे भाजप कार्यकर्त्यांची बैठक घेतली आहे. परत एकदा निवडणूकांना सामोरं जाण्याची तयारी ठेवा. असा रावल यांनी कार्यकर्त्याना सल्ला दिला आहे. शिवसेनेची ताठर भुमिका कायम राहील्यास राज्यात पुन्हा निवडणूका होण्याची शक्यता आहे असं त्यांनी सांगीतले.

Similar News