शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी पाच रुपये एवढा करण्याबाबत आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगांवचे विद्यार्थी इ. लोकांच्या जेवणांअभावी हाल-अपेष्टा होत असल्याने शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दहा रुपयाऐवजी पाच रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती.
हे ही वाचा..
- ट्रम्प सरकारच्या एका निर्णयाला शैक्षणिक संस्थांचे कोर्टात आव्हान
- विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्या ताफ्याचा अपघात
- VIDEO: कोण आहे ‘राजगृहा’वर हल्ला करणारा हल्लेखोर…
ही मुदत त्यापुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी वाढविण्यात आली असून 6 कोटी रुपये एवढ्या वाढीव खर्चासही मान्यता देण्यात आली.