..तर हजारो प्रकल्पग्रस्त अंबानींच्या घरावर धडकतील : बी जी कोळसे पाटील

`` गोली खाएंगे लाठी खाएंगे लेकीन पीछे नही हटेंगे, लढेंगे जितेंगे या गगनभेदी घोषण देत रिलायन्स नागोठणे कडसुरे मटेरियल गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सायंकाळी उशिरा  तिसऱ्यांदा बी जी कोळसे पाटील यांनी सपत्नीक भेट देऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित करून प्रचंड उर्जित केले.

Update: 2020-12-06 12:30 GMT

`` गोली खाएंगे लाठी खाएंगे लेकीन पीछे नही हटेंगे, लढेंगे जितेंगे या गगनभेदी घोषण देत रिलायन्स नागोठणे कडसुरे मटेरियल गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सायंकाळी उशिरा  तिसऱ्यांदा बी जी कोळसे पाटील यांनी सपत्नीक भेट देऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित करून प्रचंड उर्जित केले.

पूर्वीची आयपीसीएल व आत्ताची रिलायन्स कंपनी करीता ज्या स्थानिक भूमिपुत्र,  शेतकऱ्यांची जमीन भूसंपादीत करण्यात आली.  त्यांना नोकरी देण्याचा सरकारचा करार आहे, मात्र हे व्यवस्थापन आडमुठे पणाची भूमिका घेत आहे. जनशक्तीची त्यांना कल्पना नाही. त्यामुळे रिलायन्स नागोठणे येथे आम्हाला न्याय न मिळाल्यास हजारो प्रकल्पग्रस्तांसमवेत

अंबानींच्या घरावर धडक देऊ असा इशारा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांनी दिला. रिलायन्स नागोठणे कडसुरे मटेरियल गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सायंकाळी उशिरा  तिसऱ्यांदा बी जी कोळसे पाटील यांनी  सपत्नीक भेट देऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित करून प्रचंड उर्जित केले. 36 वर्षांपासून येथील स्थानिक भूमिपुत्र, प्रकल्पग्रस्त न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. आमच्या मागण्या रास्त व न्यायिक आहेत. प्रकल्पग्रस्तांचा लढा संविधानिक मार्गाने व कायद्याच्या चौकटीत आहे. आम्ही आजवर अहिंसक मार्गाने अनेक लढे जिंकले आहेत, आम्ही एकही आंदोलन हरलेलो नाही हा आमचा इतिहास आहे. जेल , पोलीस व मरणाला भिणारे आम्ही नाहीत, आम्हाला गोळ्या घाला, जेलमध्ये टाका आम्ही मागे हटणार नाही, न्याय मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढत राहणार असा इशारा बी जी कोळसे पाटील यांनी यावेळी दिला.

ते पुढे म्हणाले की  संघवीरहीत महाराष्ट्र सरकार बनवण्यात माझा सिंहाचा वाटा आहे, मात्र एकही मंत्री प्रकल्पग्रस्त व भूमीपुत्रांच्या आंदोलनाकडे फिरकत नाही हे दुर्भाग्य असल्याची खंत बी जी कोळसे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. रायगड जिल्हाधिकारी व इतर प्रशासनातील अधिकारी परस्पर कंपनीत भेट घेऊन जातात पण आंदोलनकर्त्यांना भेटत नाहीत असा गंभीर आरोप देखील कोळसे पाटील यांनी यावेळी केला. 

आम्ही तलवार चालवणार नाही, लाठी काठी अथवा शिवीगाळ करणार नाही, मात्र संविधानाने दिलेल्या अधिकाराने संघटन करून अहिंसक मार्गाने अन्यायाविरुद्ध पेटून आंदोलन करू असे कोळसे पाटील म्हणाले. पोलीस व जवान हे आमच्याच मातीतील सुपुत्र आहेत, शेतकऱ्याने पिकवलेले धान्य खाऊनच ते मोठे झालेत, त्यामुळे ते सारे आपले मित्रच आहेत असे कोळसे पाटील म्हणाले. ज्या आंदोलनात महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी असतात ते आंदोलन यशस्वी होतेच असा विश्वास दर्शवित आजवर महिला भगिनींच्या सहभागाने अनेक आंदोलने जिंकली आहेत, हा लढाही आम्ही जिंकू असे कोळसे पाटील म्हणाले. आम्ही अनेक आंदोलन केली, आमच्या लढ्यात आंदोलक चर्चेला जातात, मी कधीही चर्चेला अथवा तडजोडीला जात नाही, त्यामुळे बी जी कोळसे पाटील कधीच विकला जाणार नाही असे देखील त्यांनी ठणकावून सांगितले. 

कंपनीत कष्ट करणारे रक्त आटविणारे कामगार यांना त्यांच्या श्रमाच्या एक दशांश मोबदला देखील मिळत नाही. कामगार हे मूळ मालक आहेत, त्यांच्या जीवावर कारखाना उभा आहे. याची जाणीव ठेवली पाहिजे. कंपनी चे आपण मालक आहोत, कंपनी जगली पाहिजे , सुरक्षित राहिली पाहिजे ही आमची कायम भूमिका राहिली आहे. असे बी जी कोळसे पाटील म्हणाले. यावेळी बी जी कोळसे पाटील यांनी आजवरच्या अनेक आंदोलनाचा इतिहास उजागर केला. आंदोलनाचा दहावा दिवस असून

देखील आंदोलनकर्त्यांचा जोश व ऊर्जा कायम पाहायला मिळत आहे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, कोण म्हणतोय देणार नाय, घेतल्याशिवाय राहणार नाय, गोळी खाएंगे लाठी खाएंगे लेकीन पीछे नही हटेंगे, लढेंगे जितेंगे या गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला आहे, याबरोबरच भजन व कीर्तनाचा नाद देखील दमदारपणे दणाणत आहे. अशाप्रकारचे धडाकेबाज, मात्र शिस्तबद्ध आंदोलन नागोठण्याचा इतिहासात पहिल्यांदाच झाले असल्याचे बोलले जात आहे. येथील स्थानिक भूमिपुत्र प्रकल्पग्रस्तांनी ऐक्याची वज्रमुठ आवळून 36 वर्षाचा हा लढा पुन्हा जिवंत केला आहे, या लढ्याचे नेतृत्व

लढाऊ नेते उच्च न्यायालयाचे माजी   न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील करीत आहेत. ज्यांनी आजवर केलेले  प्रत्येक आंदोलन लढा यशस्वी केला आहे. हा इतिहास आहे. आपल्या हातात नोकरी मिळाल्याशिवाय येथून हटायचे नाही. आपण जिंकणारच असा विश्वास लोकशासन संघर्ष समितीचे मुख्य संघटक राजेंद्र गायकवाड यांनी व्यक्त केला.

सहाव्या दिवशी  रिलायन्स व्यवस्थापन व आंदोलनकर्ते यांचे शिष्टमंडळ यांच्यात बैठक पार पडली मात्र बैठक निष्फळ ठरल्याने आंदोलकांनी आपले आंदोलन पुढे सुरूच ठेवण्याची भूमिका घेतली. 

या आंदोलनात संघटनेचे पदाधिकारी शशांक हिरे , गंगाराम मिणमिणे , प्रमोदिनी कुथे , चेतन जाधव , सुरेश कोकाटे , बळीराम बडे , अनंत फसाळे , प्रशांत शहासने , तेजस मिणमिणे , जगदीश वाघमारे , सुजित शेलार , प्रमोद कुथे , एकनाथ पाटील , मोहन पाटील , गुलाब शेलार , नीता बडे , उषा बडे , निलेश शेलार , जनार्दन घासे , गौतमी शेलार , रूपा भोईर आदींसह नागोठणे ते चोळे विभागातील शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले आहेत . आंदोलनस्थळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक अशोक दुधे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. `` गोली खाएंगे लाठी खाएंगे लेकीन पीछे नही हटेंगे, लढेंगे जितेंगे या गगनभेदी घोषण देत रिलायन्स नागोठणे कडसुरे मटेरियल गेटसमोर सुरू असलेल्या आंदोलनाला शनिवारी सायंकाळी उशिरा  तिसऱ्यांदा बी जी कोळसे पाटील यांनी सपत्नीक भेट देऊन आंदोलनकर्त्यांना संबोधित करून प्रचंड उर्जित केले.

रिलायन्स म्हणते मागण्या अवाजवी व अवास्तव

या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर रिलायन्स व्यवस्थापनाकडून मात्र आंदोलनकर्त्यांच्या मागण्या अवाजवी व अवास्तव असल्याचे वारंवार सांगितले जाते, त्यामुळे या आंदोलनाचा तिढा कधी व कसा सुटणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. 

Tags:    

Similar News