#FarmersProstests शेतकरी आंदोलन चिघळलं, शिवसेनेचा केंद्र सरकारवर हल्लाबोल...

Update: 2021-01-26 10:28 GMT

FarmersProstestsप्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला आज हिंसक वळण लागलं आहे. या ट्रॅक्टर मोर्चात आत्तापर्यंत एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून परिस्थिती अजुनही नियंत्रणाबाहेर आहे. काही अज्ञात लोक दिल्लीच्या लाल किल्ल्याभोवती देखील जमले आहेत. शेतकरी आंदोलक शेतकऱ्यांना शांत राहण्याचं आवाहन करत आहेत.

शेतकरी आणि पोलिसांमध्ये झटापट झाली आहे. यावरुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरद्वारे मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. तिरंग्याचा अपमान सहन करणार नाही, सरकारने ठरवलं असतं तर हिंसा टाळली असती असं म्हणत मोदी सरकार कायदे का रद्द करत नाही? असा सवाल करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.


Tags:    

Similar News