सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो; शिवसेना आमदाराचे वादग्रस्त विधान

Update: 2021-11-08 13:37 GMT

औरंगाबादचे शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट हे एका वक्तव्यामुळे अडचणीत सापडले आहे. औरंगाबाद येथे सरपंच परिषदेत बोलताना शिवसेना आमदाराची घसरली जीभ आणि त्यांनी ग्रामसेवक बद्दल वादग्रस्त विधान केला आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे

राज्यातील ग्रामसेवकांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतांना, एक सांगतो कधी ग्रामसेवकाच्या नादी लागू नका, कारण सगळ्यात भामटा ग्रामसेवक असतो ,तो कधी मूर्ख बनवेल सांगता येत नाही असे विधान शिरसाठ यांनी केलं आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले असून, राज्यभरातील ग्रामसेवक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

यावर बोलताना शिरसाठ म्हणाले की, मी काही चुकीचं बोललो नाही. राज्यातील काही ग्रामसेवक असे असतात मात्र मी सर्व ग्रामसेवकांबद्दल असं वक्तव्य केले नाही.

Tags:    

Similar News