गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणाऱ्या अयोध्या प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पूर्ण झाली.
आज या सुनावणीचा 40 वा दिवस होता. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठात ही सुनावणी पार पडली. यावेळी गोगोई यांनी आजचा दिवस हा सुनावणीचा दिवस असेल असं स्पष्ट केले हिते. त्यामुळे या खटल्याच्या 40 व्या दिवशी ही सुनावणी पूर्ण होणार हे निश्चित समजलं जातं होतं.
आज झालेल्या सुनावणीत सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दोनही पक्षाला प्रश्न उपस्थित करत या जागेबाबत दोनही पक्षाच्या बाजू ऐकुन घेतल्या.