देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कपात करा: रघुनाथदादा पाटील

Update: 2020-05-15 16:08 GMT

देशाची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार कपात करा, अशी मागणी शेतकरी संघटनेने केली आहे. जिल्हाधिकार्‍यांपासून कर्मचारी आणि नगरसेवकांपासून ते खासदारापर्यंत सर्वांनाच पाचशे रुपये वेतन प्रतिमहिना द्यावा, अशी मागणी रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

शेतकरी जर ५०० रुपयात काटकसरीने जगतोय तर सरकारी नोकरदारांना काय अडचण आहे? असा सवाल ही रघुनाथदादा पाटील यांनी केला आहे. त्याचबरोबर देशाची अर्थव्यवस्था बिघडवणाऱ्या उद्योग क्षेत्राला कोणतीही मदत देऊ नये. हे पांढरे हत्ती पोसण्याची काही गरज नाही, अशी मागणी ही रघुनाथदादा पाटील यांनी केली आहे.

 

Full View

Similar News