देशभरात नागरिकत्व सुधारणा कायद्यविरोधात जनआंदोलन उसळलं आहे. अनेक ठिकाणी या जनआंदोलनांमध्ये प्रदर्शनकर्त्यांना अमानुष मारहान केली जात आहे. पोलिसांवरही सर्वत्र दगडफेक केली जातेय. या सर्व अराजकतेविषयी कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.
“लोकशाहीमध्ये सरकारच्या चुकीच्या निर्णयांविषयी आणि त्यांच्या धोरणांविरोधात आवाज उठवण्याचा, त्यांच्या चिंता नोंदविण्याचा अधिकार लोकांना आहे. भाजप सरकारने लोकांच्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे आणि मतभेद दडपण्यासाठी हिंसेचा मार्ग निवडला आहे” अशी भावना त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातुन मांडली आहे. पाहा व्हिडीओ...
https://youtu.be/eQXZVdop67I