आज राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (28 जून ला 2020) ला फेसबूक लाईव्ह द्वारे संवाद साधला. यावेळी त्यांनी 30 जूनपर्यंत असणारा लॉकडाऊन पुढेही असाच सुरु राहील याची माहिती दिली. तसंच यावेळी राज्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं आहे. यावर पहिल्यांदाच मुख्यमंत्र्यांनी भाष्य केलं.
बोगस बियाण्यांच्या तक्रारी ग्रामीण भागातून येत आहेत, त्यामुळे दुबार पेरणीचे संकट आलं आहे. मात्र, शेतकरी बांधवांना नुकसानभरपाई मिळवून देणार, आरोपींना शिक्षा करणार असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी?