महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्याची निवडणूक ११ एप्रिल झाली असून विदर्भातील नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशीम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांमध्ये मतदान झाले. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीसाठी येत्या १८ एप्रिल ला महाराष्ट्रातील बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या मतदार संघांमध्ये मतदान होणार आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यात १० जागांपैकी हिंगोली आणि नांदेड या जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या आणि उर्वरित ८ जागा युतीने जिंकल्या होत्या.
यामध्ये २०१४ मध्ये बीड, सोलापूर, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद, लातूर, परभणी, अकोला अमरावती, बुलडाणा या टप्प्याच्या निवडणुकीची आकडेवारी पाहिली तर क्रमशः अशी आहे :
बीड : या मतदार संघात ६८.७५% मतदान झालं होतं. यावेळी भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे यांना ६ लाख ३५ हजार ९९५ मतं पडली होती. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवणाऱ्या सुरेश धस यां ४ लाख ९९ हजार ५४१ मतं पडली होती. या लढतीत भाजपचे उमेदवार गोपीनाथ मुंडे १ लाख ३६ हजार ४५४ मतांनी विजयी झाले होते.
सोलापूर : या मतदार संघात ५५.५८% मतदान झालं होतं. यामध्ये भाजपचे उमेदवार शरद बनसोडे आणि काँग्रेस चे उमेदवार सुशीलकुमार शिंदे आमने सामने होते. या लढतीत शरद बनसोडे यांनी दीड लाख मतांनी पराभव केला होता. यामध्ये बनसोडे यां ५ लाख १७ हजार ८७९ मतं पडली होती तर सुशीलकुमार शिंदे यांना ३ लाख ६८ हजार २०५ मतं पडली होती. मात्र यावेळी येथे तिहेरी लढत होत असून सुशीलकुमार शिंदेंन समोर मोठं आव्हान असून आता भाजप मधून जयसिद्धेश्वर स्वामींना तिकीट दिलं आहे तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर इथून लढत आहेत.