पुण्यातील अनगोळ दांपत्याने हडपसर येथील २२ हजार चौरस फुटांचे तीन भूखंड रयत शिक्षण संस्थेला दान केले आहेत. सुमारे १५ कोटी रूपयांच्या किंमतीच्या भूखंडावर रयत शिक्षण संस्था कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुरू करणार आहे.
डॉ. मालती महावीर अनगोळ (वय ८३, रा. कल्याणीनगर, पुणे) यांनी घेतलेला हा निर्णय प्रेरणादायी आहे. मालती अनगोळ या मुळच्या सांगली जिल्ह्यातील आहेत. ऐतवडे खुर्द येथील बाळगोंड पाटील हे त्यांचे वडील अबकारी विभागात अधीक्षक होते. मालती यांना सात बहिणी व तीन भाऊ होते. त्या सर्वांत थोरल्या तर कोल्हापूरच्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. साधना झाडबुके या कनिष्ठ आहेत. मुलींच्या शिक्षणाविषयी फारसे गांभिर्याने घेतले न जाण्याचा तो काळ होता. तेव्हा कर्मवीर अण्णांच्या प्रेरणेने मालती यांनी जे. जे. स्कूल आफ इकॉनॉमिक्समधून पदवीधर झाल्या. पुढे मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य अधिशाखेच्या प्रमुखही बनल्या. इतकेच नाही तर स्टेट बँक म्युच्युअल फंडाच्या प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. त्यांचे पती पुण्यातील इलेक्ट्रॉनिक्समधील अग्रणी होते. महावीर अनगोळ यांना सौर ऊर्जा प्रकल्पात त्यांना विशेष रुची होती. याबाबतचे तंत्रज्ञान पुढच्या पिढीपर्यंत जावे यासाठी त्यांनी काही अभ्यासक्रम सुरु करण्यासाठी हडपसरमधील ही जागा १९९८ साली खरेदी केली होती. पुढे वृद्धापकाळामुळे अनगोळ दांपत्याला कौशल्य प्रशिक्षण केंद्र उभारणीचे काम जमले नाही. व्यवसायिक कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या एखाद्या नामांकीत संस्थेला ही जागा द्यावी, असे त्यांनी ठरवले.
भूखंड दानाची प्रेरणा...