जळगाव – केंद्रीय यंत्रणांच्या माध्यमातून भाजप राज्यातील नेत्यांना त्रास देत असल्याचा आरोप वारंवार केला जातो आहे. पण गृहमंत्री दिलीप वळसे पाटील भाजप नेत्यांवरील कारवाईबाबत आक्रमक नाहीत, अशी नाराजी खुद्द मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केल्याची चर्चा आहे. पण आता दिलीप वळसे पाटील यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांवरील आरोपांबाबत कडक भूमिका घ्यायला हवी असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला आहे. शरद पवार यांच्या जळगाव जिल्ह्यातील कार्यक्रमात एकनाथ खडसे यांनी जाहीरपणे हा सल्ला दिला.