Narendra Modi यांची इस्त्रायल भेट आणि Iran तणाव

Update: 2026-03-18 01:17 GMT

Modi Israel visit 2026 इराणच्या विरोधात युद्ध सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी इस्त्रायलला भेट दिली होती. या भेटीचं स्वागत करायला हवं. कारण इराणसारख्या मुस्लीम राष्ट्राचा नायनाट होणं, हिंदूराष्ट्रासाठी गरजेचं आहे. आज परिस्थिती अशी आहे की इराणच्या विरोधात सुरु असलेल्या युद्धामध्ये अमेरिका एकटी पडत आहे. फ्रान्स, जर्मनी, इटली, स्पेन इत्यादी नेटो राष्ट्रांनी या युद्धात अमेरिकेला सहकार्य करायला नकार दिला आहे.

भारतासाठी ही अतिशय उत्तम स्थिती आहे. अमेरिका आणि इस्त्रायल यांना भारताने जवळपास बिनशर्त पाठिंबा दिला होता. आता मात्र भारत इराणशी संधान बांधतो आहे. हे गैर आहे. रशियाकडून खनिज तेल खरेदी करायला अमेरिकेने आपल्याला उदार मनाने संमती दिली आहे. त्यामुळे देशात पेट्रोल वा डिझेलचा तुटवडा नाही. खनिज तेलापासून एलपीजी बनवण्याचं तंत्रज्ञान भारताकडे आहे. त्यामुळे एलपीजीच्या तुटवड्याचा भारताने गांभीर्याने विचार करण्याची गरज नाही. एलपीजीच्या तुटवड्याबाबत भारतीय प्रसारमाध्यमांमध्ये येणार्‍या बातम्या सरळ सरळ देश विरोधी आहेत. त्यांच्यावर बंदी घालायला हवी.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रवक्त्या चित्रा वाघ कळकळून लोकांना सांगत आहेत की एलपीजीची टंचाई नाही. त्यावर मतदारांनी विशेषतः भाजपच्या मतदारांनी, संघ परिवाराने, आणि अन्य मतदारांनीही विश्वास ठेवायला हवा. तसं झालं तरच भारत अमेरिका आणि इस्त्रायल यांच्या मदतीला धावून जाऊ शकेल. एका इस्लामी राष्ट्राला संपवण्यासाठी हिंदूंनी थोडी कळ काढायला हवी. घरगुती गॅस किंवा अन्य जगण्याचे प्रश्न याला अकारण महत्व दिलं तर भारतातील हिंदूंची स्थिती वाईट होईल. मोदी-शहा यांचं राज्य १५ वर्षं असूनही हिंदू खतरे में आहेत. हिंदूंनी त्यांना साथ दिली नाही तर काय होईल हिंदूंचं? जगाच्या सोडा भारताच्या नकाशावरूनही ते नाहीसे होतील अशी अवघड परिस्थिती आज आहे. या परिस्थितीत भारताने अमेरिका आणि इस्त्रायलला सक्रीय आणि बिनशर्त पाठिंबा द्यायला हवा. तरच भारताचं अर्थात हिंदूराष्ट्राचं भवितव्य उज्वल आहे. कारण आज युरोपियन राष्ट्रं ट्रम्प म्हणजे अमेरिकेकडे पाठ फिरवत आहेत. ते स्थान आपल्याला मिळू शकेल. लाखो सोडा, करोडो भारतीयांना अमेरिकेचं नागरिकत्व मिळण्याचा रस्ता खुला होऊ शकेल. आपल्या देशातील बहुसंख्य लोकांची आकांक्षा पूर्ण होईल. तसं घडलं तर इस्त्रायल प्रमाणेच भारतीय हिंदूंचीही लॉबी अमेरिकेत म्हणजे एकमेव जागतिक शक्ती असलेल्या देशात निर्माण होऊ शकेल.

भारताची लोकसंख्या एका प्रगत राष्ट्रात गेली तर आपल्या देशातले प्रश्न सोडवणंही सहजसोपं होईल. कारण लोकसंख्या कमी होईल आणि अमेरिकेत गेलेले भारतीय लाखो-करोडो डॉलर्स भारतात पाठवतील. त्यामुळे आपली परकीय चलनाची गंगाजळी समृद्ध होईल. अमेरिका आणि इस्त्रायल येथील गुंतवणुकदार भारतामध्ये अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करतील. किंबहुना या अटींवरच आपण इस्त्रायल आणि अमेरिका यांना गळामिठी मारायला हवी. हिंदू राष्ट्राच्या निर्मितीसाठी हे गरजेचं आहे. कारण इराण हे मुस्लीम राष्ट्र आणि खाडी देशातील अन्य मुस्लीम राष्ट्रं आपल्या टाचेखाली येतील.

रा. स्व. संघाचे नेते, मोहन भागवत, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल इत्यादी संघटनांनी यासाठी मोदी-शहा सरकारवर दडपण आणायला हवं. कारण त्यांना हिंदू राष्ट्र स्थापन करायचं आहे. मात्र अशी मागणी ते करत नाहीत. कारण तेही बहुधा स्यूडो सेक्युलर लोकांच्या नादाला लागले असावेत. भारताचे पंतप्रधान, भारताचे परराष्ट्र मंत्री यांचाच कित्ता ते गिरवत आहेत. हे लाजिरवाणी बाब आहे. वि. दा. सावरकर असते तर त्यांची अशी हिंमत झाली नसती. हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ घेतलेल्यांनी सेक्युलर वा फेक्युलर लोकांच्या नादी लागणं गैर आहे.


(साभार - सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)


Modi Israel visit 2026, India Israel relations latest news, Iran Israel conflict news, Middle East tensions 2026, India foreign policy Middle East, US Iran conflict update, Israel Iran war news, global oil crisis Middle East, India diplomacy Israel Iran, geopolitical tensions Middle East

Similar News