राज्य दुष्काळात होरपळत असताना त्याची झळ सांगलीसारख्या जलसमृद्ध जिल्ह्यालाही हसलीय. सांगलीतील वाळवा आणि शिऱाळा तालुक्यांच्या सीमेवर असलेल्या ऐतवडे बुद्रुक या गावातही दुष्काळाने पिण्याच्या पाण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची टंचाई निर्माण झालीय. त्याशिवाय सर्व राज्यातच सरकार कशी दुष्काळ ग्रस्तांची फसवणूक करीत आहे. दुष्काळी उपाययोजनांची कशी वाणवा आणि निधीत कसा भष्टाचार केला जातोय याची माहिती राष्ट्रवादी काँगेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना दिलीय. तर जसलंधारणाच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप माजी आमदार आणि साखर कारखान्याचे चेअरमन मानसिंगराव नाईक यांनी केलाय.