आज विधानसभा निवडणुकीचा प्रचार थंडावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या नागपूर पश्चिम मतदारसंघातून रॅली काढत लोकांना मतदानाचं आवाहन केली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रीत सभा घेत प्रचाराचा शेवट केला. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाणे इथं सभा घेत प्रचाराची सांगता केली. वंचित आघाडीनेही प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत देगलुर-बिलोलीमध्ये आपली प्रचारयात्रा थांबवली आहे. एकुणच आता प्रचाराच्या तोफा थंडावल्या, कत्ल की रात सुरु झाली आहे.
सहभाग निधी साठी इथे क्लिक करा
https://www.facebook.com/MaxMaharashtra/videos/441294369845515/