राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील आक्रमक भाषणाची चर्चा सध्या सुरू आहे. एरवी शांत आणि संयमी भाषेत बोलणारे उद्धव ठाकरे एवढे आक्रमक का झाले आहेत? उद्धव ठाकरे यांच्या या आक्रमकतेचा अर्थ काय, भाजपने यामधून कोणता धडा घेतला पाहिजे? उद्धव ठाकरेंच्या या नवीन भूमिकेचा राष्ट्रीय पातळीवर काय परिणाम होऊ शकतो, याचे परखड विश्लेषण केले आहे, मँक्स महाराष्ट्रचे संपादक रवींद्र आंबेकर यांनी