ठाकरे सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी - गोपीचंद पडळकर

Update: 2021-10-29 12:20 GMT

राज्यात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांचे सत्र सुरू आहे. अशावेळी ठाकरे सरकारमधील एकही मंत्री एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांचे अश्रू पुसण्यासाठी गेला नाही. मात्र हेच मंत्री आर्यन खानची काळजी घेण्यामध्ये व्यस्त आहेत, असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे, ते पंढरपुरमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर आंदोलन सुरू आहे. याच प्रश्नावर राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उपसले आहे. परंतु राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांमध्ये फूट पाडून संप मोडीत काढला आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव येथे एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे.‌ आतापर्यंत राज्यात अनेक कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. मात्र एकही मंत्री आत्महत्याग्रस्त कुटुंबाची भेट घेण्यासाठी गेलेला नाही. त्यांना कोणतीही मदत केली नाही, अशी टीका पडळकर यांनी केली आहे. हे सरकार ड्रग्ज आणि गांजा माफियांच्या मागे असल्याचा आरोप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.

Tags:    

Similar News