मुख्यमंत्री गायब झाला कुठं तो अडीच वर्ष गाव्हलाच नाही, शहाजी पाटील यांचे टीकास्र

Update: 2022-10-06 04:54 GMT

बुधवारी झालेला दसरा शिवसेनेच्या इतिहासात ऐतिहासिक ठरला. कधी नव्हे तो शिवसेनेचे दोन दसरा मेळावे झाले. बीकेसी मैदानात झालेल्या मेळाव्यात शहाजी बापू पाटील यांनी उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला.

टीका करताना मुख्यमंत्री गायब झाला कुठं तो अडीच वर्ष गावलाच नाही. अशी टीका त्यांनी उध्दव ठाकरेंनी केली. त्यानंतर गुवाहाटीच्या डोंगरातून शिंदे साहेबांनी औषध आणलं आणि त्यांना दिलं. प्रत्येक निवडणुकीला एकनाथ शिंदेंना भरभरून मतदान कराल अशी अपेक्षा करतो.असं म्हणत शहाजी बापूंनी काय ते बीकेसी ग्राउंड, काय ती गर्दी, काय तो भगवा झेंडा, काय ते एकनाथ शिंदे साहेब सगळं एकदम ओके असा डायलॉग देखील मारला.

Full View

Tags:    

Similar News