"राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं म्हणणाऱ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा" ; शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांना टोला

Update: 2021-12-27 11:53 GMT

सातारा  :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी सरकार स्थिर ठेवण्यात यशस्वी झाले आहेत असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले आहे. सोबतच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल असं म्हणणाऱ्या भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पवारांनी टोला लगावला आहे. नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत असं पवार यावेळी म्हणालेत.

सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजच्या नूतन इमारतीच्या उद्घाटनासाठी संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ शरद पवार साताऱ्यात आले होते त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

चंद्रकांत पाटील यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल अशी शक्यता वर्तवली आहे याबाबत पत्रकारांनी विचारले असता शरद पवार म्हणाले की, "नवीन वर्षात त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यात, विधिमंडळात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्पष्ट बहुमत आहे. राज्य सरकार स्थिर ठेवण्यात उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झालेत , त्यामुळे जे लोक अस्वस्थ असतात ते अशा प्रकारची विधानं करत असतात," असा टोला पवारांनी लगावला.

"त्यांनी याआधीही अशा प्रकारची विधानं केली आहेत. त्याची नोंद महाराष्ट्रात सामान्य लोक घेत नाहीत. त्यामुळे त्यावर अधिक भाष्य करण्यास इच्छुक नाही," असं सांगत त्यांनी म्हटले आहे.

Tags:    

Similar News