महाविकास आघाडीचा नॅनो मोर्चा देवेंद्र फडणवीस यांनी उढवली खिल्ली...

Update: 2022-12-17 14:26 GMT

महाविकास आघाडीने आजचा काढलेला मोर्चा पूर्णपणे असफल झाला आहे तीन पक्ष एकत्र येऊन ही गर्दी जमली नाही. हा सर्वात नॅनो मोर्चा होता अशी खिल्ली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडवली आहे. आम्हीं आझाद मैदानावर सभा घेण्याचं सांगितलं होतं मात्र मात्र गर्दी जमणार नाही हे लक्षात आल्यावर लहान रस्त्यातून हा मोर्चा काढण्यात आल्याच फडणवीस यांनी सांगतील. महाविकास आघाडीच्या मोर्चा नंतर प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिली.

उद्धव ठाकरे यांच्या वरही फडणवीस यांनी टीका केली आहे शिवसेना पक्ष दिवसेंदिवस लहान होत आहे तसा आजचा मोर्चाची नॅनो झाला असा खोचक टोला लगावला. स्वातंत्रवीर सावरकरांवर काँग्रेस टीका करत होते तेव्हा का नाही मोर्चा काढला असा सवालही फडणवीस यांनी ठाकरे यांना केला आहे.

महाविकास आघाडीला मोर्चा काढण्याचं अधिकार नाही त्यातही शिवसेनेला नाही हिंदू देवतांवर , संतांवर तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मावर केलेल्या वक्तव्य करणाऱ्यांनी आम्हाला बोलू नये, तसेच कर्नाटक महाराष्ट्र सीमा वाद आपल्या सरकारने निर्माण केला नाही, तर काँग्रेसने गेल्या 60 वर्षांपासून चिघळत ठेवला आहे असा आरोपही फडणवीस यांनी यावेळी केला.

शिंदे-फडणवीस सरकार फेब्रुवारीत जाणार असा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी या मोर्चात केला त्यालाही फडणवीस यांनी उत्तर दिलं. तुम्हाला सरकार चालवता आलं नाही तुमच्या नाकाखालून सरकार आम्हीं स्थापन केल.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात सरकार पूर्ण काळ काढेल, तसेच एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वात पुन्हा आम्ही सत्तेत येऊ असा दावाही देवेंद्र फडणवीस यांनी केला.


Full View

Tags:    

Similar News