सभागृहाने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक व्हायला हवी! - उदय सामंत

Update: 2021-12-28 08:53 GMT

विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक सभागृहाने घेतलेल्या निर्णयानुसारच व्हायला हवी, असे मत राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना सांगितले.

राज्यात विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा पेच दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. राज्यपालांनी सरकारने निवडणूक प्रक्रियेत केलेले बदल घटनाबाह्य असल्याचे सांगून नवा अडथळा निर्माण केला यावर बोलताना उदय सामंत यांनी सभागृहाने घेतलेल्या निर्णयानुसार निवडणूक व्हायला हवी असं मत व्यक्त केलं.

याशिवाय ओमायक्रोनचे आणि कोरोनाचे रुग्ण राज्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. शासनानेही नाईट कर्फ्यु लावून नवे निर्बंध लावले आहेत. अशात महाविद्यालयांबद्दल बोलताना,"टास्क फोर्सकडून अहवाल मागवला आहे त्यानंतर याबद्दल निर्णय घेऊन आपल्याशी बोलेन" असं ते मॅक्स महाराष्ट्रशी बोलताना म्हणाले.

Tags:    

Similar News