राजकारण्यांचं आणि अधिकाऱ्यांचं महापुरात नक्की काय चुकलं? महेश झगडे
महापूर: राजकारण्याचं आणि अधिकाऱ्यांचं काय चुकलं? पाहा माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांचं विश्लेषण
आपत्ती आल्यावर सर्व सूचना करतात. हे झालं पाहिजे. ते व्हायला पाहिजे. मात्र, आपत्ती येणार नाही. यासाठी कोणीही काम करताना दिसत नाही. अशी थेट टीका माजी सनदी अधिकारी महेश झगडे यांनी केली आहे. ते मॅक्स महाराष्ट्रच्या टू द पॉईंट या कार्यक्रमात बोलत होते.
महाराष्ट्रात अतिवृष्टी आल्यानंतर अशा घटना घडू नये म्हणून प्रत्येक गावाचा आराखडा तयार व्हायला हवा. आपत्ती पूर्वीच उपाययोजना करायला हव्यात असं मत त्यांनी व्यक्त केलं आहे.
राजकारणी कसे चुकत आहेत. अधिकारी कसे चुकत आहेत याचं थेट विश्लेषण महेश झगडे यांनी या कार्यक्रमात केलं. दौ-यांमुळे काय होतं, अधिकाऱ्यांचं मनोधैर्य कसं कमी होतं? राजकारणी कसे अधिका-यांना दम देतात? या विषयी त्यांनी माहिती दिली. नक्की पाहा...