War, Media and Mental Stress : जगातील युद्धाच्या गदारोळात अशांत बनले मन !
Trump Netanyahu Putin global conflict सुरळीत चाललेले जग डोनाल्ड ट्रम्प, नेतन्याहू आणि ब्लादिमीर पुतीन यांनी अकारण अस्वस्थ करून सोडले यांनी केलेल्या मानवी हत्या बालकांची खून पाहिले तर यांना युद्ध गुन्हेगार म्हणून शिक्षा द्यायला हवी. आजच्या काळात जगभर अनेक ठिकाणी युद्धाचे ढग दाटलेले दिसतात. News of war, violence दूरदर्शन, Youtube यूट्यूब आणि इतर सामाजिक माध्यमांवर सतत युद्ध, हिंसा आणि विध्वंसाच्या बातम्या झळकत असतात. क्षणाक्षणाला येणाऱ्या या बातम्या पाहताना अनेक जण नकळतपणे त्यात गुंतून जातात. परिणामी मनात अस्वस्थता, भीती आणि संभ्रम वाढत जातो. ज्या घटनांवर आपले कोणतेही नियंत्रण नाही, त्यावर सतत विचार करत राहिल्यामुळे मानसिक गोंधळ अधिकच वाढतो.
Russia Ukraine war impact प्रत्यक्षात पाहिले तर जगातील Political राजकीय संघर्ष, महासत्तांचे हितसंबंध आणि युद्धाचे निर्णय हे सर्वसामान्य माणसाच्या नियंत्रणाबाहेरचे असतात. परंतु सामाजिक माध्यमांच्या सततच्या प्रभावामुळे सामान्य माणूस जणू त्या संघर्षाचा मानसिक भाग बनून जातो. त्याचा परिणाम असा होतो की आपल्या स्वतःच्या जीवनातील प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी आपण दूरच्या घटनांमध्ये भावनिक गुंतवणूक करू लागतो. खरे तर जीवनाकडे पाहण्याची शहाणी दृष्टी वेगळी असते. आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टींवर चिंतेची उर्जा खर्च करण्यापेक्षा आपल्या व्यक्तिगत जीवनात येणाऱ्या अडचणींना धैर्याने सामोरे जाण्याचा मार्ग शोधणे अधिक महत्त्वाचे आहे. कुटुंब, आरोग्य, समाजातील जबाबदाऱ्या आणि स्वतःचा बौद्धिक व नैतिक विकास या गोष्टींकडे लक्ष दिल्यास जीवन अधिक अर्थपूर्ण बनते.
भारतीय संतपरंपरेत आणि तत्त्वज्ञानातही हाच संदेश दिला गेला आहे. संतांनी “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” असे सांगत सहकार्य, संयम आणि सकारात्मकतेचा मार्ग दाखवला. जगातील विध्वंसाच्या बातम्यांनी अस्वस्थ होण्यापेक्षा आपल्या आसपासच्या समाजात शांतता, सहकार्य आणि माणुसकी वाढविण्यासाठी प्रयत्न करणे हेच खरे कर्तव्य आहे. आज माहितीच्या स्फोटाच्या युगात विवेक ठेवणे अत्यंत आवश्यक झाले आहे. जगात काय घडत आहे याची जाणीव असणे आवश्यक आहे, परंतु त्या घटनांनी आपल्या मनःशांतीचा ताबा घेऊ नये. विवेकाने निवडलेली माहिती आणि संतुलित विचारसरणी यामुळेच मन स्थिर राहू शकते.
म्हणूनच आजच्या अस्थिर काळात एक साधा पण अत्यंत महत्त्वाचा जीवनमंत्र लक्षात ठेवायला हवा. जगातील गदारोळात हरवण्यापेक्षा आपल्या जीवनातील कर्तव्ये, जबाबदाऱ्या आणि सकारात्मक प्रयत्न यांवर लक्ष केंद्रित केले, तरच व्यक्ती आणि समाज दोघांचेही जीवन अधिक शांत, संतुलित आणि अर्थपूर्ण होऊ शकते.