Agricultural export crisis due to war : इरान-अमेरिका युद्ध शेतमाल निर्यात ठप्प !
इराण अमेरिका युद्ध - केळीचे शेकडो कंटेनर अडकले..
Banana export from India to Iran Iraq इराण अमेरिका युद्धामुळे आखातीदेशात निर्यात होणाऱ्या शेती मालावर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धाचा थेट भारतीय शेतमालाच्या भावावरही झाला आहे. जळगावसह सोलापूर,आंध्रप्रदेश होणारी केळी निर्यात थांबली आहे.तर शेकडो कंटेनर केळी घेऊन निघालेल्या जहाजांना माघारी फिरावे लागले आहे. या घडामोडींचे परिणाम होऊन दोनच दिवसात जळगावात केळी भाव प्रतिक्विंटल ३०० रुपयोनी घसरले आहेत. गेल्या आठवड्यात केळीला असलेला २१०० रुपये भाव आता १८०० रुपयांपर्यंत खाली आला आहे.
जळगाव जिल्ह्यातून पुढील आठवड्यात इराण, इराकसह आखाती देशात केळी निर्णयतीची प्रक्रिया सुरु होती. त्यासाठी निर्यातदार कंपन्यांनी ५० कंटेनर नाशिक येथील कोल्ड स्टोरेजला पाठवली आहे. ही केळी मुंबई बंदरातून समुद्रमार्गे मागणी असलेल्या देशांत रवाना होणार होती. मात्र इरान युद्धामुळे ही सर्व निर्यात थांबली आहे. पुढील आठवड्यात पुन्हा २५ कंटेनर पाठवण्याचे नियोजन होते. मात्र आखातीदेशांत सुरु असलेले युद्ध भारतीय शेती आणि शेतकऱ्यांसाठी मोठं नुकसानीचे ठरलं आहे.
इराणचे बंदर बंद
इरान इस्रायल अमेरिका युद्ध ज्वर शिगेला पोहोचल्याने जळगाव आंध्र प्रदेश, सोलापूरचे एकूण जहाजमार्गे २०० कंटेनर केळी घेऊन इराणला पोहोचले होते. पण, तेथील बंदर बंद असल्याने आणि तेथील कंपन्यांनी माल घेण्यास नकार दिल्याने भारतीय व्यापाऱ्यांना ते जहाज परत माघारी फिरावे लागले. Agricultural export crisis due to war