Women Rights : "हिंदू धर्म उदार झाला पुरोगाम्यांमुळे, कट्टरवाद्यांमुळे नाही, इराण टीकेच्या नावाने ढोंग थांबवा!"
Women harassment हिंदु कट्टरवादी ही अजब जमात आहे. आज ते इराणमध्ये बायकांना कसा त्रास आहे, Iran इराण किती मागास आहे हे सांगत आहेत आणि hindu हिंदू धर्म किती विशाल हृदयी आहे तेही सांगत आहेत. अर्थात त्याच विशाल हिंदू धर्माला हेच कसे संकुचित करतात हे मात्र सांगत नाहीत. इतकी ढोंगी जमात कधीही पाहिली नसेल कोणी. हिंदू धर्म उदार झाला तो पुरोगामी लोकांनीच केला म्हणून. इथं Raja Rammohan Roy राजा राममोहन राॅय नावाचा माणूस जन्माला येईपर्यंत तुम्ही बायकांना चितेत ढकलत होता बांबूनं. ज्ञानेश्वर नावाचा पुरोगामी जन्माला आला नसता तर तुम्ही गीता कधीच सामान्य हिंदूपर्यंत नेली नसती, पुरोगामी तुकारामाच्या गाथा तुम्ही बुडवल्या इंद्रायणीत! तुम्ही दोघांनाही छळलंय, त्यांनी हिंदू धर्म पुढे नेला, तुम्ही नाही.
अस्पृश्यतेविरोधात गांधी-आंबेडकर लढलेत, कोणी कट्टरतावादी नाही लढला. दलित-सवर्ण विवाहातच मी जाणार ही गांधींची भूमिका कोणत्याही कट्टरत्वादी नेत्यानं घेतलेली नाही तुमच्या. हजारो हिंदू बायकांना हुंडाबळी जावं लागलं, तुम्ही कधी कायदा नाही मागितला त्यासाठी. तो पुरोगामी लोकांनी आणला. हिंदू कोड बिलाला विरोध केला तुम्ही मुलींना आणि महिलांना हक्क मिळू नये म्हणून.
केशवपन फक्त तुमच्या म्हणजे कट्टर घरांमध्ये होतं, पंधरा वर्षांच्या बालविधवेचे केस कापतांना तुमचा हात नव्हता थरथरत. महात्मा फुले आणि लोकहितवादी दोघं लढलेत त्याविरूद्ध. तुम्ही त्यांच्या जिवंतपणी अंत्ययात्रा काढल्यात. विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर आणि स्वतः बाबासाहेब लढलेत विधवा पुनर्विवाहासाठी. हे तिघंही पुरोगामी आहेत. शुद्रातिशुद्रांची गोष्ट सोडा, तुमच्या घरातल्या बायकांना पण तुम्ही ज्ञानबंदी घातली होती. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, फातिमाबी, महर्षि कर्वे असे पुरोगामीच लढलेत स्त्री शिक्षणासाठी. तुम्ही तर दगड मारत होता त्यांना. बुद्धीप्रामाण्यवाद महाराष्ट्रात आगरकर आणि प्रबोधनकार ठाकरेंनी रुजवला आहे. दोघंही पुरोगामी होते. त्यांच्याही जिवंतपणी अंत्ययात्रा काढल्यात तुम्ही सुधारणा करत होते म्हणून. जेव्हा तुमचे माफीफेम नेते दलितांसाठी वेगळी पतितपावन मंदिरं बांधण्याचा मानभावीपणा करत होते तेव्हा साने गुरूजी नावाचा पुरोगामी पंढरपूरात दलितांच्या मंदिर प्रवेशासाठी उपोषण करत होता. बाबासाहेब काळाराम मंदिरात सत्याग्रह करत होते.
मनुस्मृती जाळायची तुमची आजही हिंमत आणि मानसिकता नाही. बाबासाहेबांना तेव्हा बापूसाहेब सहस्रबुद्धे आणि छत्रे हेही पुरोगामी होते. कट्टरवादी नव्हते. लांबचं जाऊ द्या. या राज्यात बाबा बुवांचा उपद्रव थांबावा आणि अंधश्रद्धेपायी हिंदूंचं होणारं शोषण टळावं म्हणून नरेंद्र दाभोलकर नावाचा पुरोगामी शहीद झालाय. कोणत्या हिंदुत्ववाद्याला कधी वाटलं की बुवाबाजी थांबली पाहिजे? तुम्ही तर उत्तरेतले विकृत बाबा बुवा पोसून त्यांच्या जीवावर राजकारण करणारे लोक. बुवाबाजी तुम्हाला पाहिजे आहे.
हिंदू श्रमिकांचे आर्थिक लढे लढता लढता पानसरे सरांना शहीद व्हावं लागलं तुमच्या हातून. तुम्ही कधी काय केलं हिंदू शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी लोकांसाठी? 'एक गाव एक पाणवठा' व्हावा म्हणून शेवटी पुरोगामी बाबा आढाव मरमर करतात, तुम्ही तर विहीरीवर पाणी प्यायलं म्हणून मारहाण करणारे लोक! इराणमध्ये स्त्रीयांचा छळ आहे? बरोबरच आहे. इथं व्हॅलेन्टाईन डे ला तरुण मुलींना दमदाटी करणारे बजरंग दलवाले तुमचेच ना? कर्नाटकात 'मुलींनी जीन्स पॅन्ट घालू नये म्हणून राडा करणारी श्रीराम सेना कोण आहे? पुरोगामी? एरवी हिंदुत्ववादी वगैरे असलेले लोक 'बघाबघा बाहेर कसा स्त्रियांचा छळ होतो आणि भारत कसा सुरक्षित आहे' अशी ढोंगबाजी करायला लागले की फार करमणूक होते! इतके ढोंगी हे कसे असू शकतात असा प्रश्न पडत नाही कारण ते तसेच आहेत हे आता कैक वर्ष सिद्धच होतंय.
कट्टरवाद्यांनो, स्वतःच्या मतलबानं भारताला पुढारलेला ठरवायचं असेल तर नुसत भारत पुढारलेला आहे एवढंच म्हणून पळायचं नाही. 'आम्ही कट्टरतावादी इतके प्रयत्न करतो तरीही पुरोगाम्यांमुळे हिंदू धर्म आणि भारत प्रागतिक आहे' असं पूर्ण आणि खरं बोलायचं. स्वतः कट्टर रहायचं आणि कट्टरतेचा विषय आला की देशामागे लपायचं हे धंदे बंद करा. वृत्तीचा विचार केला तर खामेनी आणि तुमच्यात काहीच फरक नाही हे लक्षात घ्या.
(साभार - सदर पोस्ट विश्वंभर चौधरी यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)