Samruddhi Highway : समृद्धी महामार्गावर सारखे अपघात का होतात ? नेटकऱ्यांच्या कमेंट्स आवर्जून वाचा
अत्यंत गाजावाजा झालेल्या मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या अखेरच्या टप्प्याचं अवघ्या तीन आठवड्यांपूर्वीच उद्घाटन झालं. याच टप्प्यातील रस्त्यावर पावसाचं पाणी साचलं होतं. साचलेलं पाणी एका गाडीच्या काचेवर पडल्यानं चालकाला समोरचं काहीच दिसलं नाही. वेगात असलेल्या मर्सिडिजच्या चालकाची गाडी दुसऱ्या लेनमध्ये पलटी झाली अन् यात नाशिकचे उद्योजक सुनील हेकर यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातामध्ये हेकरे यांची दोन मुलं आणि पत्नी देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी वेगानं पसरल्यानंतर आता समृद्धी महामार्गावर सातत्यानं अपघात का होतात, याविषयी नेटकऱ्यांमध्ये अभ्यासपूर्ण चर्चा सुरु झाल्या आहेत.
कसा घडला अपघात ?
हेकरे कुटुंबिय हे त्यांच्या मर्सिडीज GLS 400D या गाडीतून मुंबई-नाशिक प्रवास करत होते. त्यांची गाडी इगतपुरी बोगद्यापासून जवळच असलेल्या शहापूर हद्दीत आली तेव्हा समृद्धी महामार्गावर पाणी साचलेलं होतं. त्या साचलेल्या पाण्यातून दुसरी गाडी पुढे गेली आणि त्यामुळं उडालेलं पाणी हेकरे यांच्या गाडीच्या समोरच्या काचेवर पडलं. हेकरे यांचा मुलगा वेगानं गाडी चालवत होता. त्यामुळं त्याला समोरचं काहीच दिसलं नसावं. हेकरे यांची गाडी डिव्हायडर तोडून पलटी घेत दुसऱ्या लेनमध्ये गेली. यात दुर्दैवानं सुनील हेकरे यांचा मृत्यू झाला. या मर्सिडिज एसयूव्ही मध्ये ९ एअर बॅग असूनही हेकरे यांचा जीव वाचला नाही.
समृद्धी महामार्गाबद्दल नेटकऱ्यांच्या अभ्यासपूर्ण कमेंट्स
sweety Sonal · Concret road मुळे झाला हा accident...अरे कुठे गेले ते मूर्ख लोक जे म्हणतात हलके टायर असतील तर accident होतात. नायट्रोजन हवा भरा, भारी टायर वापरा. Speed 100kmph ठेवा... अरे बेअक्कल लोकांनो. आता ही Mercedes होती तरी गेली...Problem गाडीच्या टायर मध्ये नाहीच आहे...Problem रस्त्यात आहे...Concret Road is so dangerous ...Concret road खूप कमी दिवसात चिकन होऊन जातो. त्यामुळे असे रोड ceramic टाइल्स सारखे सटकते होउन जातात खूप जास्त गुळगुळीत होतात. मग या रस्त्यांवर काही टेक्नोलॉजी काम नाही करत. ना traction control, ना भारी tyres., ना ABS. ना तुमची अक्कल.
Rajesh Bapu Tipale : sweety Sonal म्हणजे डांबरी रोड वर अपघात होत नाही? डांबरी रोड वर काचेवर पाणी आलं असतं तर अपघात झाला नसता. हुश्शार
Prakash Padole : sweety Sonal रस्ते कसेही असले तरीही चालवण्यावर अवलंबून असते, accident कुठेही आणि कसेही होऊ शकतात,
Avinash Kale Kale : sweety Sonal मरसिडिज, ऑडी कार कंपनी ग्राहकांना सांगते की 100 च्याच स्पीड नें चालवायची
Krishna Choudhary : sweety Sonal आपण एकदा बातमी वाचा.सायरस मिस्त्रीचा मृत्यू कोणत्या कारणाने झाला?
Suhas Bhavsar : sweety Sonal रस्त्यावर पाणी साचलेच कसे याबद्दल कुणी बोलत नाही.
Sachinn Shinde : sweety Sonal ओ बाई एकतर त्याठिकाणी गुळगुळीत रोडवर अचानक खड्डे पडले आहेत त्यामुळे त्यांच्या काचेवर शेजारून जाणाऱ्या कारचे टायर खड्यात जाऊन खराब पाणी काचेवर आले अचानक तिथे ड्राइवर डिस्टर्ब झाला, त्यामुळे कारचा कण्ट्रोल गेला. आणि साहजिकच इतका गाजावाजा झालेला रोड म्हणजे स्पीड असणारच.
Neel Patil : sweety Sonal बरोबर आहे सिमेंट हे घर बनवण्यासाठी असते आणि डांबर रस्ता बनवण्यासाठी पण बेअक्कल सत्ताधाऱ्यांनी पैसे लुबाडण्यासाठी सर्व काँक्रिटिकरन केलं आहे
sweety Sonal · दुबई चीन सारख्या आती प्रगत देशात सुद्धा लांब पल्ल्याच्या रस्ते हे डांबरीकरण झालेले आहे. तिकडे नाही हे concrete चे रिकामे तमाशे. म्हणून तिकडे साधे टायर वाली कार(skoda, Volkswagen, Hyundai ) जरी असेल तरी तिचा speed 150 to 200 kmph average असतो. Concret रोड चा दीड शहाणपणा फक्त भारतात दिसतो. आनि ह्या रोड वर कार 80 90 kmph जरी वेग असेल तरी ती vibration करते. स्थिर चालत नाही... आनि डांबरी रोड वर 120 kmph ला पण smoothly कार चालते. आनि डांबरी रोड वर गाडी लवकर control होते. Concret रोड वर गाडी स्लिप मारते तसेच भारी चे टायर पण खूप लवकर तापतात. त्यामुळे Concret road वर 4 to 5 inch ची एक layer डांबरीकरण पाहिजेच
Rajesh Bapu Tipale : sweety Sonal आपण भारतीय आहोत. स्वयंशिस्त चे भोक्ते आहोत असं नाही वाटतं? बाकी गाडी व्हायब्रेट होते हे बरोबर आहे. गाडी चालवणारा सारथी असायला हवा. सतरा प्रकारचे रोड असतात. पावसाळ्यात चिखलाचा, रेती माती पसरलेला, तेल पडलेला, उन्हाळ्यात डांबर वितळलेला, खड्याचा, घाटाचा, वळणाचा, सिमेंट चा,......... खुप प्रकारचे प्रत्येक वेळी शिव्याशाप देत रहायच की यशस्वी पणे गाडी चालवायची? ड्रायव्हर आणी संयम याचा काही संबंध आहे का नाही.
sweety Sonal · Rajesh Bapu Tipale गाडी चे vibration हे driving skill वर नसते. ते तर car आनि road वर अवलंबून असते आनि मुळात डांबरी रोड आनि concret road मध्ये खूप फरक आहे. डांबरी रोड थोडेसे लवचिक असतात. म्हणजे ते स्वतःहून प्लेन होतात. जास्त तापले तर ते जसे मेन वितळून समान पसरून जाते तसे concret नसते. Concret टणक होउन जाते. आनि दिसायला प्लेन जरी दिसत असले तरी त्यात अनेक उंच खोल भाग असतात. जे नवशिक्या आनि नावाला गाडी चालवणार्या लोकांना समजत नाही की गाडी का vibration करते. आनि हे भंगार सरकार ने एवढा पैसा खर्च करून रोड बनवला आहे तर बोलणारच ना. काय मारण्यासाठी tax द्यायचा का. आनि 8 9 तास वाचतील असे गडकरी बोलले होते. जर 80 90 चा Speed असेल तर कशाला पोहोचणार.
Rajesh Bapu Tipale : sweety Sonal चांगले लिहिले पण.... अभ्यास अजून करायला हवा. घर शेणाने सारवलेल शास्त्र शुद्ध की चकाकणारे गुळगुळीत घसरून पडाल अशा लाद्या लावलेलं? ८० ते १०० स्पिड ची हेवी लाईट ट्रक गाडी ब्रेक दाबते तेव्हा त्या रोडच्या जागेवर एक आंदोलन तयार होत. (अणू वर रेणू आपटवून जि विपरीत उर्जा तयार होते त्या प्रक्रियेला आंदोलन म्हणतात) अशी रोज अनेक आंदोलने एंड टू एंड रोडवर रोजच्या रोज चारही ऋतूत चालू असतात. त्या प्रत्येक वेळी प्रत्येक एकेक आंदोलनाला डांबरी रोडचे वेगवेगळे थर वेगवेगळ्या प्रमाणात डिस्टर्ब होतात. हे वजन आणी स्पिड आणी ब्रेकचा खेळ, वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळ्या प्रमाणात रोड खराब करतो. खास करून उन्हाळ्यात जेव्हा डांबरी रस्ता वितळायला लागतो. आपल्या जनतेला जशी स्वयंशिस्त नाही तसच गव्हरमेंट आपल्या सारख्या लोकांनीच बनलं आहे. त्यात मग विचार विनीमय करून बेअर मिनीमम बेअर मिनीमम काय करता येईल तर सिमेंट रोड. अशा निष्कर्षाप्रत एकमत झाले.आणी सिमेंट रोड जन्माला आले. आता फायदे तोटे तर सगळीकडेच असतात. बाकी, तुमच्या घराच फ्लोरींग कसलं आहे
Anand Sanglikar : मूळात लोकं वेग नियंत्रित करत नाहीत त्यामुळे हे अपघात होतात. वेगमर्यादा पाळावी आणि इतरांना रस्त्यावर वळण्यापूर्वी नीट सिग्नल देणे आवश्यक असते ट्रॅफिक सुरक्षितता ही वस्तुस्थिती आपले भारतीय लोक नाकारत असतात त्यामुळे ते गाड्या नीट ट्रॅफिक सुरक्षितता जपून चालवत नाहीत.
Suresh Phadnis : वेळ आली होती, गाडी किती कोटीची असेना उपयोग शून्य
Santosh Jadhav : जो गाडी जोरात पळवेल, तो जोरात यम देवतेच दर्शन करणार, हा सृष्टीचा नियम आहे..
Shrikant Bijwe : अति वेग आणी सीट बेल्ट न लावल्या मुळे गाडीतून बाहेर् फेकले गेले . सीट बेल्ट का लावत नही ?
Pravin Muley : मला बराच अनुभव आहे या मार्गावर. बहुतांश गाड्या ह्या 100 किंवा त्यापेक्षा कमी वेगाने चालतात. पण या Mercedes किंवा Toyota ह्या गाड्या सुसाट असतात. कदाचित superiority कॉम्प्लेक्स असावा.
Rajesh Gonsalves : I have noticed few big and VERY DANGEROUS Drivings of people:
- Some Drive High speed/ Some Moderate speed but, ZERO LANE DISCIPLINE, Lot's of Drive on Lane making
- Mobile phones while driving. Least 5-6 in 10 people are talking on phones while driving.
- Trucks and Buses are a big Disaster. Maximum of them don't follow Lane discipline.
- Trucks and Buses driver's, almost all are on phones while driving.
- Poor Car conditions and Specially worn out Tyres are big issues. Such people Drive High speed and then Tyres burst.
- Some people don't know how to drive and keep driving in middle of Roads making it dangerous for everyone.
Pankaj Shinde : एअर ब्याग आणि कितीही महाग गाडी असो किंव्हा कोणत्याही कंपनीची गाडी असो स्पीड जास्त असेल तर मरण निश्चित आहे याला पर्याय प्रत्येक गाडीला 100 चा स्पीड लॉक कंपलसरी करायला हवा ह्यावी गाडीला 60 आणि कार ला 100
Nishad Kadam : मी ही या रोडने अनेकदा गरजेनुसार प्रवास करतो पण डांबरी रोडवर प्रवास करण्याचा जो मजा आहे तो या रोडवर मिळत नाही गाडी खूप जास्त जम्प करते या रोडचे डांबरीकरण केल्यास अनेक जीव वाचतील प्रवास सुखकर होईल अपघात कमी होतील पण अनेकांना हा रोड करणाऱ्या बद्दल जे अतिव प्रेम आहे त्याबद्दल आपल्यासारख्याने काय बोलावे. पैसे देऊन जीव घालवण्यापेक्षा जुन्या रोडने प्रवास करणे कधीही योग्य
Kiran Kolhe : समृद्धीमुळे कोणाची समृद्धी होते तेच कळत नाहीये. ___रोख ठोक.
Ameya Sukhi : किती पण दणकट गाड्या घ्या पण पाठी सीटबेल्ट लावणार नाही तर जेव्हा पण गाडी अशी पलटी मारते लोक पॅनरॉमिक सनरूफ ची काच फोडून बाहेर फेकले जातात…१२०-१४०kmph च्या स्पीड ला जेव्हा गाडी पलटी मारते कमीत कमी ३-४ वेळा रोल होते त्यात जर बेल्ट लावला नसेल तर अशी हानी होते जीवाची.
Sachinkarule Sachin Karule : गाडी जरी दोन कोटीची असली तरी जीव तो गेला समृद्धी मार्ग हा जीवघेणा आहे फक्त मोठ्या मोठ्या गोष्टी आहे बाकी काही नाही
Ankush Khamkar : रोड गाडी एअर बॅग ही काही नाही वेळ आली की काळ येणार मग ती मार्सडिझबेंज असो किंवा अल्टो असो..मी स्वतहा 160 km पर hours Ertiga घेऊन गेलो होतो काही नाही .
Chandrashekhar Sawant : अश्या कॉमेंट करूनका ,नाहीतर परत काँक्रिट रोडवर डांबरीकरण करायचे म्हणून टोल वाढेल .....
Pradip Patil Solanke : समृद्धी मार्ग हा पुर्ण जंप्पीग रोड आहे ठीक ठीकानी प्याच देन सुरु आहे एत्या 10/15 वर्षात हा रोड पुर्ण प्याच देऊन देऊन डबल दुसरा समृद्धी रोड तयार होईल इतके प्याच देन सुरु आहे सरकारने पैसा कमवायला हा रोड झट पट बनवला आणि सुरु केला पन जंप्पीग मुळे जनतेचा जीव जातोय
Pravin Shrisunder : समृद्धी महामार्ग हा अतिशय उत्तम महामार्ग आहे काही त्रुटी सोडल्या तर अगदी परदेशातील रस्त्याच्या तोडीचा आहे.... इथला कमाल वेग 120 KM/H दिलेला आहे.. म्हणजे 120 च्या वेगाने कार चालवायची अशी जबरदस्ती नाही.. आपण आपली चारचाकी 80/90 च्या सुरक्षित वेगाने चालवावी.. आपली चारचाकी कोणतीही असो दीड कोटीची असो दीड अब्ज किमतीची.... आपला जीव ह्यापेक्षाही किमती आहे.... मी जेष्ठ नागरिक असून ह्या समृद्धी महामार्गावरून कित्येकदा स्वतः बोलेरो Drive करत गेलेलो आहे.. Speed 80/90 km/H..... आणखी एक अशा किंवा कोणत्याही रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून चारचाकी वेगात नेताना त्या पाण्यामुळे रस्ता व टायर्स ह्यामध्ये संपर्क राहात नाही व चारचाकी कंट्रोल मध्ये राहात नाही व SKid होते…
Ramesh Kurude : Pravin Shrisunder मी पण 2022 पासून अनेकदा समृद्धी महामार्गावरून प्रवास करत असतो. ( साधारण 600 किमी जाणे आणि 600 किमी येणे) कधी सहकुटुंब तर कधी एकटाही प्रवास करतो. मी होंडा सिटी ZX 2006 आताही वापरतो. गाडी चांगली मेन्टेन ठेवली आहे. मला आतापर्यत कधी काही प्रोब्लेम आला नाही, कारण एकच स्पीड 80/90 पेक्षा जास्त नसते.
Sanjay Kamble : जे झाले ते खूप वाईट झाले ,,,,असे कोणाच्याही बाबतीत या पुढे घडू नये हीच प्रार्थना…पण मी नेहमीच या रस्त्याने जातो ,,,तुम्ही जर वेगाचे नियम पाळले तर खरच हा महामार्ग खूप सुंदर आहे,,,पण अती वेग,,गाडी पळवण्याच आनंद,,, मद्यपान करणे नियंत्रण नसणे चालक नवीन अनुभव कमी हे कारण अपघाताला पुरेसे आहे,रात्रीचा प्रवास शक्यतो टाळा नाहीतर पुरेशी माहिती व झोप घेऊन प्रवास करावा,,,