War Impact : गॅस टंचाई आणि बंद होणाऱ्या मेस, विद्यार्थ्यांच्या स्थलांतराची भीती !
गॅस टंचाईने विद्यार्थ्यांचे शहरातील आयुष्य धोक्यात... युद्ध जर अनिश्चित काळासाठी चाललं तर भारतातल्या मुला- मुलींच्या आयुष्यावर त्याचा कसा आणि किती दूरगामी परिणाम होऊ शकेल? यासंदर्मभात मयुरी डी. यांचा लेख
Maharashtra fuel shortage हे सगळं आता नव्या लॉकडाऊन कडे चाललंय असं वाटू लागलं आहे. युद्धामुळे गॅसचा, पेट्रोलचा तुटवडा पडू लागलाय.. हॉटेल्स, रिसॉर्ट आणि विकेंड प्लॅन्स रद्द होतायत अशा बातम्या येऊ लागल्यात. LPG shortage affecting mess and hostels पण मला त्या हॉटेल्स पेक्षा वसतीगृहे, खानावळी, मेस, नाश्त्याचे जॉइंट्स, बंद पडू लागलेत याची जास्त चिंता वाटत आहे. लाखो विद्यार्थी पुण्या-मुंबईत कोचिंगसाठी, परीक्षांसाठी, कामासाठी स्थलांतरित होतात.. मेसवर अवलंबून असतात. पुण्याच्या पेठांमधल्या खानावळी, मेस, डबेवाले बंद झाले तर ही पोरं करणार काय? सगळं सोडून घरी जाणार? आणि घरगुती खानावळी चालवणारी, डबे देणारी कुटुंब? त्यांचं काय? त्यांचा रोजगार?
या घरी जाण्याच्या विचारानं मलाच धडकी भरते. एकदा २०२० च्या लॉकडाऊनमध्ये पेठा रिकाम्या होतात म्हणजे नेमकं काय होतं हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. त्या नुसत्या रिकाम्या होत नाहीत. अनेक वर्षांची मेहनत वजा होते. सगळा स्कोर निगेटिव्ह कडे वाहायला लागतो. मुलींसाठी हे घरी जाणं म्हणजे आयुष्य पणाला लावण्यासारखं असतं. अनेकजणी अटेंप्टच्या भरोश्यावर वेळ मारुन नेत असतात. दरवर्षी एका अटेंप्टसाठी लग्न टाळता येत असतं. अशावेळी अनिश्चित काळासाठी जेव्हा लॉकडाऊनमध्ये पोरी घरी गेल्या होत्या त्यातल्या अनेकजणी कधीच परतून आपल्या स्वप्नांकडं येऊ शकल्या नाहीत.
आज सकाळी सकाळी गॅसच्या तुटवड्याची भीषणता दाखवणाऱ्या बातम्या समोर आल्यापासून युद्ध जर अनिश्चित काळासाठी चाललं तर भारतातल्या मुलींच्या आयुष्यावर त्याचा कसा आणि किती दूरगामी परिणाम होऊ शकेल या विचारानं मस्तक हललं.. फक्त पुण्यातच नाही तर भारतातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये अशीच अनेक जणं स्वप्न बॅगेत भरुन आलेली सगळीच मुलंमुली या युद्धाचे अप्रत्यक्ष बळी असणार आहेत. आणि गॅस सोबतच इतर इंधनाचा तुटवडा लक्षात घेतला तर परत एकदा घडू शकणाऱ्या back migration साठी परत पायी चालणाऱ्या झुंडी फक्त एकदा डोळ्यासमोर आणा. म्हणजे कदाचित युद्ध समर्थन करणाऱ्यांचे डोळे उघडतील. लोकांना वाटतं "तिकडे दोन देश लढतायत हमे उससे क्या? एवढं पण काही लगेच सगळं बंद पडत नाही काही.." तर आत्ता याक्षणी कदाचित काहींना हे पटणार नाही पण युद्धज्वरात आपण सगळे पोळल्यावाचून राहणार नाही एवढं फक्त ध्यानात असू द्या..