`पार्टी विथ डिफरन्स` असं सांगत शिस्तीचा पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टीचे खा. गोपाळ शेट्टी यांनी संसदीय समितीचे राजीनामे दिले आहे. गरज पडली तर खासदारकीचा राजीनामा देऊ अशी घोषणा त्यांनी केली. काय आहे खा. शेट्टीच्या नाराजीचे कारण? झोपडपट्टीवासीयांना कायमस्वरुपी पक्क्या घराची ते मागणी का करत आहेत? त्यांचा राग कोणावर ? केंद्रावर की राज्यावर ? खासगीकरणातून गोरगरीबांचे गृहस्वप्न साकार होईल का? काय आहे गोपाळ शेट्टींच्या मनात.. पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर....