दिवसभर टिवटिव करणारे भाजपचे शेंदाड शिपाई आता गप्प का? - यशवंत जाधव

Update: 2021-12-19 12:23 GMT

मुंबई : भाजपच्या नेत्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त राजकारणासाठी हवे असतात. असं म्हणत शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी किती प्रेम आहे, हे बंगळुरुच्या घटनेच्यानिमित्ताने दिसून आले आहे. या घटनेनं भाजपच्या देशभरातील नेत्यांनी पेटून उठणे आवश्यक असताना सगळ्यांचेच रक्त नासके, अशी खरमरीत टीका शिवसेना नेते जाधव यांनी केली आहे. त्यांनी एक पत्रक जारी करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला.बंगळुरुमधील घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे

यावेळी जाधव यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावरही जोरदार टीका केली आहे. छत्रपतींनी हिंदुत्वाची व्होट बँक तयार केली असा जावईशोध चंद्रकांतदादांनी लावला. इकडे गृहमंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्रात पाऊल ठेवताच आपण छत्रपतींच्या भूमीत आल्याचे सांगितले.मात्र दुसरीकडे भाजपशासित राज्यात घडलेल्या घटनेचा करायला एकाचेही तोंड उघडले नाही असं जाधव म्हणाले. "विटंबना ही छोटी घटना" असे म्हणणाऱ्या कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा बोटभर निषेध करता आला नाही, याकडे जाधव यांनी लक्ष वेधले.

एरवी दिवसभर टिवटिव करणारे भाजपचे शेंदाड शिपाई काल दिवसभर गप्प बसून होते. भाजपचे तालुकास्तरीय नेतेही कुठे दिसले नाहीत. यांचे पक्षप्रेम छत्रपतीप्रेमापेक्षा जास्त आहे, याचा आणखी कोणता पुरावा हवा?, असा सवाल जाधव यांनी उपस्थित केला.

Tags:    

Similar News