5 वर्षात गुलामासारखी वागणूक मिळाली, संजय राऊतांचा भाजपवर निशाणा

Update: 2021-06-12 11:36 GMT

भाजप शिवसेना युतीच्या असलेल्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात गेल्या पाच वर्षात शिवसेना संपवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न गावोगाव तेही आपण सत्तेत असताना करण्यात आला. पाच वर्षे सत्तेत असूनही आपण गुलाम होतो. गुलामासारखी वागणूक मिळाल्याचा धक्कादायक विधान शिवसेनेचे संजय राऊत यांनी जळगाव जिल्ह्याच्या शिवसेनेच्या मेळाव्यात करण्यात आलं.

संजय राऊत यांच्या या विधानामुळे भाजप शिवसेना वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदीं आणि उद्धव ठाकरे भेटीनंतर पुन्हा शिवसेना भाजप एकत्र येण्याचं बोललं जातं असतानाच राऊत यांचं वक्तव्यामुळे भाजप सेनेत युतीत पुन्हा मिठाचा खडा पडला की काय? यावर भाजपच्या काय प्रतिक्रिया काय असेल हे पाहणं ही महत्वाचे आहे

Full View

Tags:    

Similar News