शेतीच्या वादातून मागासवर्गीय वस्तीवर हल्ला, चौघे गंभीर जखमी

Update: 2020-12-11 16:22 GMT

बीड : बीड जिल्ह्यातील माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावात दलित वस्तीवर शेतीच्या वादातून हल्ला करुन मारहाण कऱण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. गोदावरी पात्रातील गाळपेऱ्याची जमीन काढण्यावरून झालेल्या वादातून मागासवर्गीय वस्तीतील एका कुटुंबातील स्त्री-पुरुषांवर गावातील काहींनी लाठ्या काठ्या आणि कुऱ्हाडींनी जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप करण्यातआ आला आहे. या हल्ल्यात अनेकजण गंभीररित्या जखमी झाले असल्याची माहिती मिळते आहे. सुंदर लक्ष्मण अवघडे , सर्जेराव लक्ष्मण अवघडे, विष्णू सुंदर अवघडे, ज्ञानेश्वर सुंदर अवघडे, सीमा अवघडे निर्मला, अवघडे राणुबाई सुंदर आवघडे, अनुसया सर्जेराव अवघडे, बाळासाहेब अवघडे व दिपक अवघडे ही जखमींची नावं आहेत. यातील चार जणांची प्रकृती गंभीर असून त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हालवण्यात आलं आहे. सवर्णांनी हा हल्ला केला आहे असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केला आहे.

Full View


Tags:    

Similar News