जालन्यात किरकोळ वादातून तरुणाचा खून, वाढदिवसाच्या पार्टी तरुणाच्या जिवावर बेतली

Update: 2024-02-04 05:56 GMT

जालन्यातील हॉटेल आदर्श पॅलेस येथे वाढदिवसाची पार्टी सुरु असतांना मित्रा-मित्रात वाद होऊन झालेल्या वादातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून खून केल्याची धक्कादायक घटना दि.3 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. दरम्यान खून झाल्याची माहिती मिळताख चंदनझीरा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.

मित्राचा वाढदिवस असल्याने बदापूर येथील नवनाथ गोपीचंद कुलभैये हा 26 वर्षीय तरुण छत्रपती संभाजीनगर रोडवर हॉटेल आदर्श पॅलेस येथे मित्रासोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी आला होता.या दरम्यान मित्राचा वाढदिसाची पार्टी सुरु असतांना झालेल्या वादातून एकाने दुसर्‍याच्या डोक्यावर दारुची बॉटल फोडली.त्याचा राग आल्याने अरुण श्रीसुंदर याने नवनाथ कुलभैये याच्या पोटात चाकू खूपसून रक्तबंबाळ केलं. दरम्यान जखमी नवनाथला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केलं. नवनाथ आणि अरुण हे दोघेही एकाच ट्रान्सपोर्टमध्ये कामाला होते.या घटनेची माहिती मिळताच चंदनझीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संम्राटसिंग राजपूत यांनी घटनास्थळी भेट दिली.या प्रकरणात पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. सदरील मृतदेह हा उत्तरीय तपासणीसाठी शासकीय सामान्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलाय. किरकोळ कारणावरुन खून झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.तर शहरात घडत असलेल्या या खुनांच्या घटनांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.

Tags:    

Similar News