रायगड : दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 60, तलई गावात 49 मृत्यू

Update: 2021-07-24 03:08 GMT

रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांमधील मृतांची संख्या 60वर पोहोचले आहे.

रायगड जिल्ह्यात दरडग्रस्त मृतांचा आकडा 60 वर पोहचला,महाड तालुक्यातील तलई 49 आणि पोलादपूर तालुक्यातील साखर सुतारवाडीमध्ये 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तलई गावावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेतील 49 मृतदेह आतापर्यंत आढळले आहेत. तर अनेकजण अजून बेपत्ता आहेत. मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. शिंदे यांनी रात्री उशिरा या भागाला भेट दिली, तसेच इथल्या बचावकार्याची माहिती घेतली. प्रचंड पाऊस आणि अंधार यामुळे रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते, सकाळी लवकर हे शोधकार्य पुन्हा सुरु करण्यात आले आहे.




शुक्रवारी सकाळी या गावातील 32 घरांवर दरड कोसळली होती. यामध्ये अनेकजऩ दबले गेले आहेत. यातील 49 जणांचे मृतदेह आतापर्यंत बाहेर काढण्यात आले आहेत. तर अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत. राज्य सरकारतर्फे या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत सरकारने जाहीर केली आहे. तसेच जखमी झालेल्या लोकांनी सर्व मदत आणि त्यांचे पुनर्वसन करण्याची घोषणाही सरकारने केली आहे. स्थानिक यंत्रणा आणि NDRFच्या टीम या मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे महापूर आला आहे. यामुळे या भागात हाहाकार उडाला आहे. अऩेक ठिकाणांवरुन आता हेलिकॉप्टरच्या सहाय्याने नागरिकांना हलवण्यात येत आहे.




 


Tags:    

Similar News