मोदींनी प्लास्टिक बंदी करून त्यावर जगणाऱ्या आम्हा गरिबांच्या पोटावर पाय दिला आहे. आधी प्लास्टिकच्या बाटल्या प्लास्टिक विकून आम्हाला पैसे मिळायचे. बाटल्यांचा दर आज २० ते २५ रूपये किलोवरून ४ ते ५ रूपये किलोवर आला आहे आणि दिवाळीनंतर ते ही विकत घेणार नाही. असं ठेकेदाराने सांगितलंय. त्यामुळे आता आम्ही जगायचं कसं? असा सवाल सूरुड ता. वाई जि. सातारा येथून स्थलांतरीत होऊन कोल्हापुरात तावडे हॉटेल परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत पवार यांनी पंतप्रधान मोदींना केलाय.
https://youtu.be/s01bCBQIEsE