देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत उभे राहणारे "आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र" गुजरातला नेऊन नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसून मोठा विश्वासघात केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा महाराष्ट्र मोदी - शहांच्या राक्षसी वागण्याला कधीही माफ करणार नाही असं सामाजिक कार्येकर्ते धनंजय शिंदे यांनी म्हटलं आहे.
IFSC केंद्रामुळे मुंबईत मोठ्याप्रमाणात रोजगारनिर्मिती होणार होती मात्र आता हा रोजगार गुजरातमध्ये पळवून नेण्यात आला आहे. मुंबईचं आर्थिक महत्व कमी करण्यामागे मोदी सरकारचा नेमका हेतू काय आहे. सांगतायेत सामाजिक कार्यकर्ते धनंजय शिंदे... पाहा हा व्हिडिओ...