महाराष्ट्राचे विषय मोदींच्या कानावर घातले : शरद पवार

महाराष्ट्रात वेगाने राजकीय घडामोडी होत असताना सर्वांना धक्का बसेल अशा पध्दतीनं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar)यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीं (narendra modi)ची दिल्लीत भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. पंतप्रधान मोदी यांच्यासोबतच्या भेटीत महाराष्ट्रातील दोन मुद्द्यांवरही चर्चा केल्याचं सांगत गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न प्रलंबित आहे. महाविकास आघाडीने शिफारस केल्यानंतरही राज्यपालांनी १२ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं नाही, हा विषय मी पंतप्रधानांसमोर मांडला असल्याची माहिती शरद पवार यांनी दिली आहे. तसंच राज्यसभा खासदार आणि दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या अन्यायकारक कारवाईचा विषयही मी नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.;

Update: 2022-04-06 12:25 GMT
0
Tags:    

Similar News