कुणी बोललं की इडीची बिडी पेटवतात, भुजबळांचा हल्लाबोल

Update: 2021-07-06 12:29 GMT

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी सरकारतर्फे केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात ठराव मांडण्यात आला. या ठरावावर बोलताना अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली. गेल्या ८ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बसून आंदोलन करत आहेत.

पण सरकार त्यांचे म्हणणे मान्य करण्याऐवजी त्यांच्या मार्गात खिळे ठोकत असल्याची टीका त्यांनी केली. हे शेतकरी आपलेच आहेत पाकिस्तानातून आलेले नाही, या शब्दात भुजबळांना सरकारला सुनावले. केंद्र सरकारविरोधात कुणी काही बोलले की इडीची बिडी पेटवली जाते, आणि आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो, अशी टीका त्यांनी केली.

Tags:    

Similar News